शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक

शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र;  ‘महाविस्तार एआय’ ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई: कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती होत असल्यास त्या कंपनीवर कारवाई […]

अधिक वाचा..

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि चैतन्य हेल्थ अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको-व्हीलेज यांच्यात सामंजस्य करार

शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेस चालना देणारा महत्त्वपूर्ण करार मुंबई: नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार राज्यातील विद्यापीठे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त संवर्गातील प्राध्यापक व अध्यापकांच्या प्रशिक्षणास अधिक महत्त्व दिले आहे. भारतीय मूल्याधिष्ठित शैक्षणिक नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेचे मूलभूत मूल्य समजून घेऊन शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी हा करार […]

अधिक वाचा..

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या राजशिष्टाचारात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी

मुबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देश-विदेशातील महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येथे येत असतात. त्यांच्या राजशिष्टाचार विषयक बाबींमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये याची खबरदारी राजशिष्टाचार विभागाने घ्यावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचाराबाबत झालेल्या त्रुटी प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल […]

अधिक वाचा..

कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी

एकूण सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर ठाणे: कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण ६ व्यक्ती जखमी झाल्या असून […]

अधिक वाचा..

विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी सुविधा उपलब्ध करुन देणार

मुंबई: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात पाच शासकीय विद्यानिकेतन निवासी शाळा सुरू आहेत. या शाळांमधून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढणे अपेक्षित असल्याचे सांगून विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी शाळांना आवश्यक शिक्षक आणि इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्यातील पाच शासकीय विद्यानिकेतनच्या विविध समस्यांबाबत […]

अधिक वाचा..

सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणा-यांवर करावाई करा

मुंबई: सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौ-यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणा-या अधिका-यांवर कठोर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून केली आहे. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरन्यायाधीश हे संविधानिक संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांचा अवमान […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाकडील ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑन लाईन बदल्या मुंबई: मोटार परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यामुळे पारदर्शकते बरोबरच जास्तीत जास्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्याने बहुतेक अधिकाऱ्यांचे समाधान होते. त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑन लाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी, तसेच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्याने विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री […]

अधिक वाचा..

रस्त्यांच्या कामात फक्त 25% प्रगती; मुंबईकरांना पुन्हा खड्ड्यांचा आणि गटाऱ्यांचा पावसाळा गिफ्ट

मुंबई: मुंबईतील तब्बल 2121 रस्त्यांपैकी फक्त 479 रस्त्यांचेच काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजे उर्वरित 1600 हून अधिक रस्ते अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. संपूर्ण शहर खोदलेलं, धुळीत न्हालेलं आणि आता पावसाने चिखलात बुडण्याच्या उंबरठ्यावर आहे. महापालिका आयुक्तांनी फेब्रुवारीत बैठक घेऊन 31 मे पर्यंत काम पूर्ण व्हावं, असं स्पष्ट आदेश दिला होता. मात्र या आदेशाची अक्षरशः पायमल्ली […]

अधिक वाचा..

गौरवशाली ‘महाराष्ट्र दर्शन’ प्रदर्शनाचे काल माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: महाराष्ट्राची गौरवगाथा विषद करणारे ‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’ या चित्रप्रदर्शनाचे उद्गाटन माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले. आपल्या संपन्न… समृद्ध… प्रेरणादायी महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास हा आपल्याला प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांपासून ते आपण प्रत्यक्ष आध्यात्मिक जीवनात कसं राहिलं पाहिजे याची प्रेरणा देणाऱ्या संतापर्यंत… यापुढे ही संत परंपरा या आधुनिक महाराष्ट्रामध्ये आमच्या नेत्यांपासून […]

अधिक वाचा..

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार

राज्य सरकार सर्वदर्म समभाव मानत असेल तर फुले चित्रपट करमुक्त करावा मुंबई: महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे पण आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनी केला आहे. सरन्याधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून त्यांचा अपमान केला. हे देश व राज्याला सहन न होणारे आहे, सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून […]

अधिक वाचा..