ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाण्यात यशस्वी; आपत्कालीन तयारीची प्रभावी चाचणी

ठाणे: केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेले आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या सज्जतेचे परीक्षण करणारे “ऑपरेशन अभ्यास” हे मॉक ड्रिल आज, दि. 11 मे 2025 रोजी ठाण्यातील लोढा अमारा, कोलशेत मैदानावर यशस्वीरित्या पार पडले. दुपारी 4.30 वाजता सायरन वाजवून या मॉक ड्रिलची सुरुवात झाली आणि त्यानंतर पूर्वनियोजित घटनाक्रमाप्रमाणे सर्व कार्यवाही अत्यंत प्रभावीपणे पार पडली. जिल्हाधिकारी तथा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौकी लवकरच बंद होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्‍या ( RTO border check post) कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचाली तील अडथळे दूर करणे हा आहे. अशी माहिती परिवहन मंत्री श्री. प्रताप […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि शाळा चालविल्या जातात. तसेच […]

अधिक वाचा..

जीएसटी विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहितीची होतेय गळती; अंबादास दानवे

उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वित्तमंत्र्यांकडे केली मागणी मुंबई: जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी […]

अधिक वाचा..

दहावीचा निकाल उद्या लागणार, अधिकृत संकेत स्थळावर दुपारी 1 वाजता पाहता येणार

संभाजीनगर: बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. वेळ: उद्या दुपारी 1:00 वाजता निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे https://results.digilocker.gov.in https://sscresult.mahahsscboard.in https://sscresult.mkcl.org https://results.targetpublications.org निकाल कसा पाहाल […]

अधिक वाचा..

संभाजीनगरमध्ये ‘ब्लॅकआऊट’चा सराव! कुठे व केव्हा होणार? जाणून घ्या…

संभाजीनगर: सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी (११ मे) ब्लॅकआउट मॉक ड्रील होणार आहे. हा एक सराव असून घाबरण्याचं काहीही कारण नाही. नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. क्षेत्रनिहाय ब्लॅकआऊट वेळापत्रक १) सायं. ७:३० ते ७:५० वाजेपर्यंत विद्यानगर, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांच्या एकत्रित उद्घाटन कार्यक्रम सोहळा १४ मे रोजी विधान भवनात होणार 

मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या समित्यांचे एकत्रित उद्घाटन कार्यक्रम १४ मे बुधवार २०२५ रोजी. सकाळी११.३० वाजता विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला आहे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या समित्या.२३ एप्रिल२०२५. रोजी. समित्या शासनाने जाहीर केल्या होत्या या सर्व समित्यांचे एकत्रित उद्घाटनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक१४ मे २०२५ रोजी. सकाळी […]

अधिक वाचा..

काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष

काँग्रेस पक्ष संपण्याची भाषा करणाऱ्यांना देशाचा जाज्वल्य इतिहास माहित नाही  मुंबई: काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देशात लोकशाही व्यवस्था रुजवली तसेच देशाला वैभव प्राप्त करून दिले असा पक्ष संपत […]

अधिक वाचा..

युद्धजन्य परिस्थितीत जिल्हा प्रशासन सज्ज

सुरक्षित निवारागृहांसह सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ठाणे: सध्या देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण […]

अधिक वाचा..

ठाणे जिल्ह्यातील सामाजिक संस्था, प्रशिक्षण संस्था आणि माजी सैनिक संघटनांना जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन

ठाणे: जिल्ह्यातील सामाजिक संस्था, विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि माजी सैनिक संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि इतर संसाधनांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, सर्व महापालिका आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. ही माहिती […]

अधिक वाचा..