शेतकऱ्यांनो, कोणाचा बाप तुमचा रस्ता अडवू शकत नाही ‘या’ कायद्यानुसार मिळवा शेतरस्ता

मुंबई: शेती ही आपल्या देशाची जीवनदायिनी आहे. शेतकरी आपल्या कष्टाने देशाचे पोट भरतात. पण अनेकदा गावातील जमीनदार, काही शेजारी किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. यामुळे पिके सुकतात, उत्पादन घटते, शेतीमाल वेळेवर पोहोचत नाही. आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. पण आता चिंता करण्याची गरज नाही! कारण महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी स्पष्ट […]

अधिक वाचा..

महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना ‘भारतरत्न’ देण्याचा ठराव

देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा, पुरस्काराचा गौरव वाढवणारा मुंबई: क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेनं एकमताने मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […]

अधिक वाचा..

सत्ताधारी भाजपा युतीला महाराष्ट्राचा तालाबीन करायचा आहे का

मुंबई: हास्यकलाकार कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर ओढवून घेऊन तोडफोड केली. हल्ला करणारे सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा सरकार, संविधान, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का, त्यांना कायदा हातात का घेतला. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडलेला हा उच्छाद पाहून […]

अधिक वाचा..

३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा

मुंबई: एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा! असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आमदार गोपिचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला आमदार गोपिचंद पडळकर व सदाभाऊ […]

अधिक वाचा..

नागपूर दंगल पेटवण्यास राज्य सरकारच जबाबदार

मुंबई: नागपुरच्या दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे मुद्दे मांडले त्यातून एक मुद्दा सुटला आहे. दंगलीचे समर्थन कोणीच करत नाही पण दंगल कोणी निर्माण केली? त्याची सुरुवात कुठून झाली? या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले नाहीत. या दंगलीवेळी एक हिरवी चादर पेटवण्यात आली, त्यावेळी पोलीस तेथे होते. आंदोलन करताना पोलीस अशा वस्तू ताब्यात घेते पण नागपूर […]

अधिक वाचा..

कुर्ला तहसील कार्यालयातील दलालीच्या सुळसुळाटाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा घेराव आंदोलन

मुंबई: कुर्ला तहसील कार्यालयातील दलालांची मनमानी, सामान्य नागरिकांची अडवणूक व प्रशासनाची दुर्लक्ष याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज कुर्ला तहसीलदार श्री. दिलीप रायनावार यांना घेराव घालण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले व मुंबई जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयात अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वारस […]

अधिक वाचा..

भगवती सर्वसाधारण रुग्णालयाचे खाजगीकरण थांबवा…

मुंबई: सन १९६८-६९ मध्ये बोरीवलीत ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले. पश्चिम उपनगर ते पालघर पर्यंत च्या वाढत्या लोकसंख्येमुळे ३६५ खाटांचे भगवती रुग्णालय महापालिकेतर्फे सुरू होते. नोबेल केमिस्टला जागा देऊन ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात आले. बोरीवली रेल्वे स्टेशन झालेला बॉम्ब स्फोट, २००५ साली अति पर्जन्य वृष्टी कालावधीत या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात उपचार करण्यात आले. रेल्वे, […]

अधिक वाचा..

दिशा सालियान हत्या तपासात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आदित्यचे नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दोनदा दूरध्वनी करून विनंती केली महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना हाताशी धरत दिशा सालियान मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती करणारे दूरध्वनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोनदा केले होते, असा दावा भारतीय […]

अधिक वाचा..

स्वप्ना पाटकरला न्याय देण्यासाठी शिवसेनेची महिला सेना मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

गुन्हा दाखल झालेल्या संजय राऊतवर तातडीने कारवाई करा; शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची मागणी ठाणे: उबाठा खासदार संजय राऊत यांच्या मानसिक छळाने त्रस्त झालेल्या स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार आहे. २०१६ पासून संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांचा छळ […]

अधिक वाचा..

सह्याद्री वाहिनीवरील ‘वाचू आनंदे’ विशेष कार्यक्रम

मुंबई: प्रसिद्ध कवी आणि लेखक विंदा करंदीकर यांच्या निवडक कविता व साहित्याचा अभिवाचन विशेष कार्यक्रम ‘वाचू आनंदे’ लवकरच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती, लेखिका डॉ. नीलम गोऱ्हे आणि कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या सादरीकरणातून हा साहित्यिक ठेवा रसिकांसमोर सादर होणार आहे. हा विशेष कार्यक्रम २४ आणि २५ मार्च रोजी […]

अधिक वाचा..