१० जुलै ला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर; शीतल करदेकर

मुंबई: पत्रकार हे समाजाचे चतुर्थ स्तंभ मानले जातात. दिवसरात्र मेहनत करून समाजासाठी माहितीचे दालन खुले ठेवणाऱ्या या योद्ध्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे, याच भावनेतून अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन व रोटरी क्लब नॉर्थ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने एक विधायक पाऊल उचलण्यात आले आहे. गुरुवार, १० जुलै २०२५, रोजी मुंबई मराठी पत्रकार […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने पुढे जाण्याची ताकद आम्हाला दे

मुंबई: “आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची सशक्त चळवळ आहे. गेली अनेक शतकं पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाला दिशा देण्याचं, समृद्ध करण्याचं काम केलं. आजही लाखो वारकरी ‘हरिनामा’च्या गजरात पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या दिशेनं चालताना आपल्या कृतीतून […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी मिळणार ४३,००० रुपये, जाणून घ्या सरकारच्या जबरदस्त योजनेबद्दल

संभाजीनगर: गावाकडून तालुक्याच्या किंवा शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना *स्वाधार योजनेचा* मोठा फायदा होणार आहे! योजनेची वैशिष्ट्ये दरवर्षी ४३,००० रुपये- शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांना ३८,००० रुपये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- जादा ५,००० रुपये बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- २,००० रुपये शैक्षणिक साहित्य या योजनेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना राहणे व जेवण यासाठी आर्थिक मदत करणे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ […]

अधिक वाचा..

माजी मंत्री अशोकराव पाटील डोणगावकरांच्या निधनाने समर्पित लोकसेवक हरपला

मुंबई: काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री अशोकराव पाटील डोणगावकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस विचारांचे एक समर्पित नेतृत्व व लोकसेवक हरपला आहे अशा शोकभावना महराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. अशोक पाटील डोणगावकर यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, […]

अधिक वाचा..

महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मुंबई बँकेचा पुढाकार

मुंबई: महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे केवळ धोरणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीतून सिद्ध व्हावे, या उद्देशाने मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या पुढाकाराने एक विशेष बैठक ४ जुलै, २०२५ रोजी पार पडली. बँकेच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीत महिला बचत गट व व्यावसायीकांना कर्जसुविधा आणि बाजारपेठ निर्मितीशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी […]

अधिक वाचा..

देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा मुंबई: राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे,” […]

अधिक वाचा..

तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्ष स्थानावर बसून केलेल्या राजकीय शेरेबाजीवर विरोधकांनी घेतला आक्षेप

राजकीय विधान करणाऱ्यांना या स्थानावर बसण्याचा अधिकार आहे का मुंबई: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत विरोधकांनी २९३ अन्वये प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधकांनी नाव दिले होती. पण काही आमदार उपस्थित नसल्याने तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी राजकीय शेरेबाजी केली. यावर विरोधकांनी विधानसभेत आक्षेप घेतला. या प्रस्तावावर चर्चा होत असताना कृषिमंत्री, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित नव्हते, […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरमध्ये काळा गणपती मंदिरासमोर कारने ५-६ जणांना चिरडले, एक जण जागीच ठार

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरतील सिडको भागातील काळा गणपती मंदिरासमोर एक भीषण अपघात घडला आहे, ज्यात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एका भरधाव कारने चिरडले मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ५ ते ६ जणांना चिरडण्यात आले, त्यापैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर चार जण गंभीर जखमी असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रावर हिंदी थोपवण्याच्या विरोधात, मराठीच्या अस्मितेसाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील 

मुंबई: मराठी ही केवळ एक भाषा नाही; ती महाराष्ट्राच्या अस्मितेची, संस्कृतीची, इतिहासाची आणि लोकजीवनाच्या अभिव्यक्तीचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुलेंपर्यंत, लोकशाहीच्या चळवळींपासून सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनांपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर मराठी भाषेनेच या भूमीच्या विचारांना आकार दिला आहे. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्रात मराठी भाषेवरच अन्याय सुरू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून हिंदी जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशावर […]

अधिक वाचा..