पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात उंदरांचा उच्छाद

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. वसतिगृह परिसरात उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्यांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला उंदराने चावा घेतल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी […]

अधिक वाचा..

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी

मुंबई: शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजे, या सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभाग स्तरीय _ शहर स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आवाहन उपसचिव तथा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०चे अभियान संचालक तथा राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्य अधिकारी अजित कवडे त्यांनी केले. बीकेसी येथे प्रधानमंत्री आवास योजना […]

अधिक वाचा..

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ या क्षेत्रात आदर्श निर्माण करेल

    मुंबई: महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. “या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे” या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि Effect […]

अधिक वाचा..

नॅरेडको NAREDCO सारख्या संस्थांनी एसटीच्या पुनरुत्थनांमध्ये योगदान द्यावे…

मुंबई: राज्यभरात मोक्याच्या ठिकाणी पसरलेल्या एसटीच्या ” लँड बँक” चा विकास करण्यासाठी नॅरेडको (National Real Estate Development Council) सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या अनुभवाचा फायदा एसटी महामंडळासारख्या सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देखील करून द्यावा! असे आवाहन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले . ते जिओ वर्ल्ड कनव्हेशन सेंटर (BKC) येथे या संस्थेच्या वार्षिक […]

अधिक वाचा..

सभागृहाच्या कामकाजात सातत्याने उपस्थित असाल तेव्हाच संसदीय आयुधांचा योग्य वापर शिकता येईल…

नवी दिल्ली: सभागृहाच्या कामकाजात शेवटपर्यंत सहभागी होण्याची तुमची तयारी असेल तर जनतेच्या प्रश्नावर न्याय मिळवणे शक्य आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. दिल्ली येथील विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांच्या भाषणाने झाला. नवीन सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी यासाठी पीठासीन अधिकारी प्रयत्न करत असतात असेही डॅा.नीलम गोऱ्हे यांनी […]

अधिक वाचा..

सोमनाथ सुर्यवंशींच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून न्यायालयीन चौकशी करा

मुंबई: परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्यानंतर संतप्त जनता रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. कोंबिंग ऑपरेशन करून शेकडो आंबेडकरी जनतेला बेदम मारहाण केली, अनेक निष्पाप नागरिकांना अटक केली. आंबेडकरी विचाराचा तरुण सोमनाथ सुर्यवंशी यालाही अटक करुन कोठडीत मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला पण सरकारने या प्रकरणी पोलिसांवर कठोर कारवाई केली नाही. […]

अधिक वाचा..

महिनाभरात ८ मृत्यू होऊनही राज्य सरकारला GBS आजाराचे गांर्भीय नाही

आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे मुंबई: राज्यात GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

मुंबई: “लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे”, असे धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच ” ही योजना कधीही बंद पडणार नाही!” अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थाने “जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी” या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..

मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला; मंत्री उदय सामंत

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे. त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले. रा.रं.बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर, 1940 रोजी […]

अधिक वाचा..

महायुती सरकारमधील कृषी खात्यातील घोटाळ्यावर सरकार गप्प का

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळातील कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी नाही तर अधिकारी व मंत्री यांचे खिसे भरण्यासाठीच काम करत होता असे विविध घोटाळ्यांवरून दिसत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवल्या जाणाऱ्या कीटकनाशक खरेदीतही गैरव्यवहार करण्यात आला आहे. २५.१२ कोटी रुपयांच्या खरेदीत २०.६७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराशी संबंधित अधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा..