कॉपी करणाऱ्यांनो सावधान! परीक्षा केंद्रांवर नवे नियम लागू 

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी आता मोठा बदल झाला आहे.  विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या केंद्रासाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कर्मचारी हे त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य शाळांमधून नेमले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी पाऊल राज्यातील सुमारे ३१ लाख विद्यार्थी या परीक्षांत सहभागी होणार आहेत. कॉपी रोखण्यासाठी मंडळाने […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा पुण्यासारखा विकास होईल; धनंजय मुंडे

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वागत करत अजित दादांचे अभिनंदन केले असून अजित दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याचा पुणे जिल्ह्याप्रमाणे विकास व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यात […]

अधिक वाचा..

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे […]

अधिक वाचा..

महिलांच्या विरोधात जे हिंसाचार आणि अत्याचाराचे गुन्हे आहेत ते रद्द करता कामा नयेत

पुणे: पुणे शहरांमध्ये नोव्हेंबर २०२४ पासून आतापर्यंत जे गुन्हे घडलेले आहेत त्याबाबत आज पुणे पोलीस आयुक्तालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्याचबरोबर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या कारवाईबाबत सादरीकरण केले. यावेळी घडलेल्या […]

अधिक वाचा..

मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल

मुंबई: महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत […]

अधिक वाचा..

स्त्रियांच्या मासिक पाळी ते रजोनिवृत्ती संबंधित प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

मुंबई: सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनने आज भारतातील मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनावर एक व्यापक संशोधन अहवाल सादर केला. मासिक पाळी ते रजोनिवृत्तीच्या काळात महिलांना येणाऱ्या समस्यांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहून मासिक पाळीत दुर्गम भागाततील तसेच, ऊसतोड कामगार महिलांना येणाऱ्या समस्यांबाबत वक्तव्य करून सर्वांचे लक्ष […]

अधिक वाचा..

राज्याच्या विकासात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची साथ…

मुंबई: राज्य शासनाच्या विविध विभागांतील सुमारे 1 लाख 50 हजार गट ‘अ’ व गट ‘ब’ राजपत्रित अधिकाऱ्यांचे समान प्रश्न शासन-प्रशासनाशी चर्चाविनिमयाद्वारे सोडविण्यासाठी दि.7 फेब्रुवारी 1986 रोजी “महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ” हे व्यासपीठ स्थापन करण्यात आले. सद्य:स्थितीत सर्वच खात्यांतील अधिकाऱ्यांच्या 70 खाते संघटना महासंघाशी संलग्न आहेत. वर्ष 1990 मध्ये महासंघास “शासनमान्यता” मिळालेली असून, 1995 पासून […]

अधिक वाचा..

पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा; सुनिल तटकरे

अजित पर्व… ‘दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची’ ‘नवसंकल्प’ शिबीराची शिर्डी: पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा असे आवाहन करतानाच भविष्यात विचारांची… संघटनेची दिशा घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज शिबीरात दिले. सन २०४७ पर्यंत एक बलवान पक्ष तयार करण्याची जबाबदारी आपली असून अजितदादांच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख गंभीर आणि अमान्य; अँड.अमोल मातेले

महाराष्ट्र शासनाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे, जो अत्यंत गंभीर आणि अन्यायकारक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या निर्णयाचा जोरदार विरोध केला आहे. एडवोकेट अमोल मातेले म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जातीचा उल्लेख केल्याने समाजात भेदभाव […]

अधिक वाचा..
Leader

कल्याण लोकसभा क्षेत्रातील महत्वाचे अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी घेतली बैठक

मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ […]

अधिक वाचा..