पोलिसांना पुढे करून राहुलजींचा आवाज दडपण्याचा नरेंद्र मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार नाही

मुंबई: उद्योगपती गौतम अदानींचा हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्याचे नरेंद्र मोदींशी असलेले संबंध राहुलजी गांधी यांनी लोकसभेत उघड केल्यामुळेच घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिसांना पुढे करून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण राहुल जी गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महा घोटाळ्याविरोधात राहुलजींसह आम्ही आवाज उठवत […]

अधिक वाचा..

जनता जागी आहे….राजेंहो सावधान!

मुंबई: सध्या अनिक्षा अनिल जयसिंघानी हे नाव सर्वत्र चर्चेत आहे. अमृता देवेंद्र फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्या प्रकरणी तिला अटक झालीय. तिचे वडील अनिल जयसिंघानी बुकी आहेत. विधानसभेत फडणवीस त्यांना ओळखत नाहीत असे दाखवत होते! यात विरोधकांना ते टार्गेट करताना दिसले. आ जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मुलीला व कुटुंबाला धोका असल्याचा आणि मनपा अधिकारी महेश आहेरचा […]

अधिक वाचा..

कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन महाविकास आघाडीचे आमदार विधानभवनात…

पायर्‍यांवर ठिय्या देत जोरदार निदर्शने मुंबई: आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… गारपीठग्रस्तांना नुकसान द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

गारपीठीने शेतकरी आडवा झालाय आणि पंचनामे करायला कोण नाही…

अध्यक्षमहोदय, या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही; अजित पवार मुंबई: सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. जी गारपीठ झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण जबाबदार व्यक्ती आहात या […]

अधिक वाचा..

ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात स्थानिकांवर गोळीबार

गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? मुंबई: मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ आहे. किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? असा […]

अधिक वाचा..

भाजप कार्यकर्त्याला आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी अंबादास दानवे आक्रमक

मुंबई: दहिसरमध्ये भाजप कार्यकर्त्याला स्थानिक आमदाराच्या कार्यकर्त्यांच्या जमावाने मारहाण केल्याचा मुद्दा आक्रमकपणे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात मांडून याप्रकरणी सरकारने खुलासा करावा, तसेच संबंधीतांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी केली. राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून असाच एकप्रकार दहिसर मध्ये समोर आला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यात राज्यात […]

अधिक वाचा..

हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरु आहे; जयंत पाटील

मुंबई: हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केला. हिंदू देवस्थानांच्या जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहितीच कागदपत्रांसहीत जयंत पाटील यांनी सभागृहात सादर केली. या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण आहेत, याचा लाभ कोणाला […]

अधिक वाचा..

पत्रकारांना सामाजिक व राजकीय पाठबळची गरज; शीतल करदेकर

सर्वोत्तम प्रभावी सामाजिक कार्यासाठी “मुक्ती वुमन अचिव्हर अवॉर्ड्स” ने पत्रकार शीतल करदेकर सन्मानित  मुंबई: अमली पदार्थांचे सेवन, एचआयव्ही/एड्स, महिला आणि बालकल्याण तसेच कला आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये गेल्या ५ वर्षांपासून अथकपणे काम करणाऱ्या स्मिता ठाकरे यांच्या मुक्ती फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांना मुक्ती वीर नारी पुरस्कार आणि सामाजिक प्रभावातील उत्कृष्टतेसाठी मुक्ती महिला अचिव्हर पुरस्कार देऊन […]

अधिक वाचा..

शिरूरच्या पश्चिम भागात गारांचा पाऊस…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण असून पश्चिम भागात आमदाबाद, मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी, निमगाव दुडे, फाकटे, म्हसे, माळवाडी या गावांमध्ये शुक्रवारी थोड्याफार प्रमाणात तर शनिवारी गारांसह पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले असून या वातावरणाचा इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. बियाणे तयार करण्यासाठी लावलेले कांदा […]

अधिक वाचा..

कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद

पुणे: कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत तसेच २३ मार्च रोजी रात्री ११ ते २४ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत सदर रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले […]

अधिक वाचा..