राष्ट्रवादीत नवं राजकीय द्वंद्व! रोहित पवारांचे आरोप आणि सुनेत्रा पवार–नरेश अरोरा यांच्या भेटीने खळबळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. ज्यांच्यावर रोहित पवार यांनी गंभीर आक्षेप घेतले होते, त्याच नरेश अरोरा यांच्या टीमसोबत सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये चर्चा केल्याने पक्षात नव्या चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवारांचे आक्षेप आणि दावे अजित पवार यांच्या अकाली एक्झिटनंतर तब्बल तेरा दिवसांनी […]

अधिक वाचा..

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बीडमध्ये ११ वसतिगृहे; १५९ कोटींच्या निधीला मंजुरी; सुनेत्रा पवार

बीड: बीड जिल्हा येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात तब्बल ११ वसतिगृहे उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पासाठी सुमारे १५९ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल्याची माहिती खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली. ऊसतोड हंगामादरम्यान हजारो कुटुंबे स्थलांतरित होत असल्याने मुलांचे शिक्षण खंडित होते. अनेक मुलांना शाळा सोडावी लागते […]

अधिक वाचा..

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहायक प्राध्यापक पदभरतीला मान्यता

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी, तसेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेचा सर्वसमावेशक अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर; ‘ड्रग्स-फ्री ते वर्ल्ड क्लास मुंबई’चा संकल्प

मुंबई: मुंबईला ड्रग्स-फ्री, झोपडपट्टीमुक्त आणि अतिक्रमणमुक्त करून जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी राज्य सरकारने व्यापक अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर केला आहे. प्रत्येक महापालिका रुग्णालयात डी-अ‍ॅडिक्शन सेंटर सुरू करण्यापासून झोपडपट्टी पुनर्विकास, प्रदूषण नियंत्रण आणि पायाभूत सुविधा बळकटीकरणापर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती (DPDC) बैठकीनंतर झालेल्या पत्रकार […]

अधिक वाचा..

अजितदादांसोबत आले तेच खरे कुटुंब; आनंद परांजपे यांची ठाम भूमिका

ठाणे: “कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नसतात. २ जुलै २०२३ रोजी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर जे सर्व अजितदादांसोबत आले, तेच त्यांचे खरे कुटुंब होते,” अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मांडली. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्या कुटुंबावर किती वेदना होत असतील, याचा क्षणभर विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. ठाणे […]

अधिक वाचा..

तंत्रज्ञान-उद्योग सहकार्याला नवी गती; महाराष्ट्र-वाकायामा संबंध अधिक दृढ होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र आणि जपानमधील वाकायामा प्रांत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळकट करण्यासाठी तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील हॉटेल ताजमहल पॅलेस येथे वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागा’च्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल’चे रूपांतर आता ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग’ असे करण्यात आले आहे. या नव्या विभागाच्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या […]

अधिक वाचा..

अवैध नागरिकांना दिलेली २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रे महिन्याभरात ताब्यात घ्या; महापौर रितू तावडे

मुंबई: मुंबईत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना दिलेली २३७ बोगस जन्मप्रमाणपत्रे एक महिन्याच्या आत ताब्यात घेण्याचे आदेश रितू तावडे यांनी दिले. तसेच शहरातील फेरीवाल्यांच्या जन्मप्रमाणपत्रांसह इतर कागदपत्रांची सखोल तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर संजय घाडी, भाजपचे […]

अधिक वाचा..

मंत्रालयात लाचखोरी प्रकरण: मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित मंत्री कार्यालय सील केले आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री झिरवळ यांच्या तात्काळ […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यासाठी SDG २०३० अंतर्गत स्वतंत्र निर्देशक आराखड्याची मागणी; ३% निधी खर्चाचे सादरीकरण करा

अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व सर्व आमदारांची विशेष बैठक घ्यावी, दलितवस्ती निधी आणि SIR मोहिमेवरही प्रश्न पुणे: पुणे विभागीय कार्यालयात आज जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शाश्वत विकास ध्येये (SDG २०३०) प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र जिल्हा […]

अधिक वाचा..