‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत “लोकल टू ग्लोबल” या दृष्टिकोनाला बळ दिले आहे. या दौऱ्यात त्यांनी “Strategies for Inclusive Growth” या विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला. जागतिक स्तरावर सार्वजनिक धोरण, प्रशासन आणि नेतृत्व विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये डॉ. शिंदे यांनी Public Policy, Governance आणि […]

अधिक वाचा..

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट (धारणी-चिखलदरा) परिसरात एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत कुपोषणाशी संबंधित ९२ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेळघाट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषण ही गंभीर समस्या […]

अधिक वाचा..

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता व संभाव्य भ्रष्टाचाराबाबत ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठवण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिली.यंदाही ‘खड्डेमुक्ती’साठी तब्बल ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर, “खड्डे कायम खर्चाचा महामेळा” अशी […]

अधिक वाचा..

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून सत्तेतील अंतर्गत समीकरणांचे प्रतिबिंब असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. समितीच्या रचनेतून काही वरिष्ठ नेत्यांना दूर ठेवण्यात आल्याची बाब गंभीर मानली जात असून, विशेषतः आशिष शेलार यांच्यासारख्या पक्षनिष्ठ नेत्याला वगळण्यात आल्याने नाराजी […]

अधिक वाचा..

महिलांच्या नावावरील ५०० चौ.फुट घरांना मिळकतकरात ५०% सवलत; स्थायी समितीची मंजुरी

पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान सर्व ५०० चौ.फुटांपर्यंतच्या मिळकतींना करसवलतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सत्ता आल्यानंतर ही घोषणा बदलत केवळ महिलांच्या नावावर असलेल्या मिळकतींनाच […]

अधिक वाचा..

पुण्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटना; चिमुकलीचा मृत्यू, तर मद्यधुंद कारचालकाच्या अपघातात दोघांचा बळी

पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या घटनेत मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मगरपट्ट्यात घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू हडपसरमधील मगरपट्टा परिसरात सोसायटीच्या आवारात बसविण्यात आलेली लोखंडी घसरगुंडी डोक्यावर पडून साडेचार वर्षांच्या अनिका नवनाथ देवीकर हिचा मृत्यू झाला. […]

अधिक वाचा..

‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ तत्त्वावर म्हाडाकडून २९५ सदनिकांची विक्री

पुणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सर्वसाधारण प्रवर्गातील गरजू व पात्र नागरिकांसाठी २९५ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या सदनिकांचे वितरण ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. म्हाडाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सदनिका १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि […]

अधिक वाचा..

तगाद्याला कंटाळून ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

फलटण: वाठार निंबाळकर येथील शिव लॉजिस्टिक कंपनीचे मालक व ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक रवींद्र लालासाहेब खोपडे (वय ४२) यांनी सावकाराचा तगादा, वाहन खरेदी व्यवहारातील फसवणूक आणि फायनान्स व बँक अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच बेकायदेशीर […]

अधिक वाचा..

‘१ मेपासून मराठी सक्ती’चा फुगा फुटला? विरोधानंतर सरकारची माघार

मुंबई: राज्यात ‘१ मेपासून मराठी सक्ती’ या घोषणेनंतर निर्माण झालेला वाद आता अधिकच गडद झाला आहे. परिवहन विभागाकडून करण्यात आलेल्या या घोषणेला सुरुवातीला मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांकडून तीव्र विरोध समोर आल्यानंतर सरकारची भूमिका नरम झाल्याचे दिसत आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध करताना, यामुळे त्यांच्या रोजीरोटीवर परिणाम […]

अधिक वाचा..

बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र पेटला; माफी नंतरही वाद कायम

शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप; राज्यभर आंदोलन, राजकीय प्रतिक्रिया तीव्र नागपूर: धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात तीव्र वाद निर्माण झाला आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी सत्ता समर्थ रामदास यांच्याकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती” असे विधान केले. […]

अधिक वाचा..