माजी आमदार राम सातपुते यांचा ‘हत्या कट’चा गंभीर आरोप; खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर बोट

सोलापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंग मोहिते पाटील यांना ‘मास्टरमाईंड’ ठरवले आहे. या आरोपांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. ‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’चा प्रयत्न; सातपुते […]

अधिक वाचा..

दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार; अमित शाह यांची भेट, विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे. जबाबदारी स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी राजकीय हालचालींना वेग दिला असून त्या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी पार्थ पवार, जय पवार, पक्षाचे […]

अधिक वाचा..

मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत […]

अधिक वाचा..

प्रदूषणाविरुद्ध गणेश नाईक आक्रमक; 54 टायर कारखान्यांना बंदची नोटीस, नियमभंगावर कारवाईचे आदेश

पालघर: वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाडा तालुक्यातील प्रदूषणाच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेत प्रदूषण करणाऱ्या टायर कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. डाकिवली व कोनसई येथील ग्रामस्थांनी जनता दरबारात तक्रार केल्यानंतर नाईक यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला संबंधित कारखान्यांची तातडीने पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांना टाळे ठोकण्याचे निर्देश दिले. वाडा तालुक्यात सुमारे 74 टायर पायरोलोसिस कंपन्या […]

अधिक वाचा..

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव; शरद पवार गटाच्या खासदारांच्या सह्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण

दिल्ली: एकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा रंगात असताना, दिल्लीत मात्र शरद पवार गटाच्या खासदारांनी वेगळीच राजकीय भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या तीन खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसने लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची […]

अधिक वाचा..

अमेरिकेत थरारक प्रसंग! इंजिन निकामी; पायलटचे ‘शेवटचे शब्द’ रेकॉर्ड

रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करून दोघांचे प्राण वाचले अमेरिका: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील गेन्सविले येथे एका छोट्या विमानाचा अपघात थोडक्यात टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच विमानाचे इंजिन बंद पडल्याने पायलटने इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमान थेट वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर उतरवण्यात आले आणि सुदैवाने दोन्ही पायलट सुरक्षित बचावले. सोमवारी (९ फेब्रुवारी) […]

अधिक वाचा..

गुजरातीबहुल मतदारसंघातील मराठी चेहरा; रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने तावडे यांची निवड निश्चित झाली. तब्बल २५ वर्षांनंतर शिवसेनेच्या ताब्यातील महापौरपद भाजपकडे गेले आहे. घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रितू तावडे या गुजरातीबहुल मतदारसंघातून […]

अधिक वाचा..

स्वायत्ततेकडून गुणवत्तेकडे! उच्च शिक्षणाची नवी झेप पिल्लई विद्यापीठाच्या उद्घाटनाने ज्ञानयुगाची नवी सुरुवात

नवी मुंबई: नवी मुंबईत स्थापन झालेले पिल्लई विद्यापीठ हे राज्यातील पहिले खाजगी विद्यापीठ असून महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे व ऐतिहासिक पाऊल आहे. स्वायत्ततेचा अर्थ केवळ अधिकार नसून ती गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याची मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नवी मुंबई, पनवेल येथे राज्यातील […]

अधिक वाचा..

मैथिली ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा; सरकारी रुग्णालय की मृत्यूचा सापळा…

बिहार: बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या प्रसिद्ध लोकगायिका आणि नवनिर्वाचित आमदार मैथिली ठाकूर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आले आहे. सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले. “कागदावर सर्व काही सुरळीत दाखवले जाते, पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत भयावह आहे,” अशा शब्दांत त्यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या लेखी उत्तराचा […]

अधिक वाचा..

मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा; राज ठाकरेंवर कोश्यारींचा पलटवार

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषिक मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधत “राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत” असा खळबळजनक दावा केला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. वरळी डोम […]

अधिक वाचा..