मी सोबत नांगराचा फाळ आणला आहे, माझ्या नादाला लागला तर…

सांगोला: सांगोला येथे जर्सी आणि पोस्टन भाकड गाई कत्तलखान्याला पाठवण्यास विरोध करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली. ते बोलताना म्हणाले, माझ्या नादाला लागून आजवर अनेक जण भेंडाळले आता तुम्ही आलात काय? अस बोलत महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोरक्षकांना थेट […]

अधिक वाचा..

फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; म्हणाले…

मुंबई: उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना मत द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून केली. भाजपच्या सूत्रांनी व उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असून इथले मतदार आहेत. आपले राज्यपाल उपराष्ट्रपती होत असताना आपल्या […]

अधिक वाचा..

बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव अन् राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीस…

मुंबई: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) सकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली […]

अधिक वाचा..

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देण्याच्या […]

अधिक वाचा..

बेस्टच्या निवडणुकीत पराभव का झाला? ठाकरे गटाच्या गौप्यस्फोटाने खळबळ

मुंबई: मुंबईतील बहुचर्चित बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे गट-मनसे यांच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने सर्वाधिक 14 जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे. त्यानंतर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील 7 जागांवर विजय मिळवला. पण या निवडणुकीत मनसे-शिवसेना उत्कर्ष पॅनेल यांना […]

अधिक वाचा..

ठाकरे ब्रँडचा पराभव, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट मानल्या जाणाऱ्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल ठरलाय. ९ वर्षांपासून सत्तेत असताना आणि दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतरही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. प्रसाद लाड यांचे ७ तर शशांक राव यांच्या पॅनेलचे सर्वाधिक १४ जागांवर विजय मिळवला. मुंबईमध्ये ‘ठाकरे ब्रँड’चा २१-० असा धुव्वा उडाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची […]

अधिक वाचा..

सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती सोबत विरोधी पक्षांनी ही मतदान करावे

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सोबत विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदारांनी मतदान करावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड […]

अधिक वाचा..

आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल’ म्हणत बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी 

संगमनेर: संगमनेरमध्ये कीर्तनाच्या कार्यक्रमातून झालेले एक राजकीय वक्तव्य सध्या खूप चर्चेत आले आहे. आता ते वक्तव्य मोठ्या वादाला तोंड देत असून स्थानिक राजकारण तापले आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी थेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधत ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल’ असे वक्तव्य केल्याने राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. शनिवारी रात्री घुलेवाडी येथे कीर्तनात […]

अधिक वाचा..

वसंतदादांनी तेव्हा शरद पवारांना फक्त मुख्यमंत्रीच केलं नाही तर ‘हा’ आशीर्वादही दिला…

सोलापूर: वसंतदादा पाटील यांचे सरकार शरद पवार यांनी त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार पाडले होते. पण त्यानंतर दहा वर्षांनी वसंतदादा पाटील यांनी शरद पवार यांना केवळ मुख्यमंत्रिपदच दिले नव्हते, तर राजकारणात इथून पुढे सर्व शक्ती आणि ताकद शरद पवारांच्या पाठीशी उभी करां, ते महाराष्ट्राचे भवितव्य घडवतील, असा आशीर्वादही दिला होता, त्यावेळी झालेल्या सभेचा मी साक्षीदार आहे, […]

अधिक वाचा..

पन्नास खोके म्हणताच शिंदेंच्या आमदाराची पत्नी संतापली

चित्रलेखा पाटलांना दिला धक्का, कार्यकर्त्यांची हमरातुमरी रायगड: जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळतोय, सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक […]

अधिक वाचा..