shirur-taluka-logo

जांबुत येथे सत्ता परिवर्तन जय मल्हार ग्रामविकास पॅनल ६-५ ने विजय

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील जांबुत येथे खिवराज फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार ग्रामविकास पॅनल ने बाजी मारली असली तरी खिवराज फिरोदीया हे मात्र पराभूत झाले असून निकालाची परिस्थिती “गड आला पण सिंह गेला” अशीच झाली आहे.

गावच्या माजी सरपंच जयश्री जगताप व राहुल जगताप यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलचा ६-५ ने धुव्वा उडवत हि निवडणुक अटीतटीची करत हा विजय मिळविला असुन त्यामुळे जांबुत येथे सत्ता परिवर्तन झाले आहे. हा विजय जय मल्हार ग्रामविकास पॅनेलसाठी आनंदाचा असला तरी दस्तुरखुद्द पॅनल प्रमुख फिरोदिया यांनाच पाठ टेकवावी लागल्याने “गड आला पण सिंह” गेला अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.