वाहतूक सुरक्षेसाठी मोठा निर्णय
आता दुचाकी चालक आणि सहप्रवासी दोघांनीही हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे.वाहतूक विभागाने हा कठोर नियम लागू केला असून अपघातांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
कारवाई दोघांवर होणार
विना हेल्मेट पकडल्यास चालक आणि सहप्रवासी यांच्यावर स्वतंत्र दंड ई-चलन प्रणालीत सुधारणा करून सहप्रवाशांवरही दंड आकारण्यासाठी तयारी पूर्ण.
का घेतला निर्णय
अपघातांमध्ये विना हेल्मेट झालेल्या *मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ* झाली आहे. विशेषतः दुचाकी अपघातांमध्ये जीव गमावणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
दंड किती असेल
हेल्मेट न घातल्यास दंड दोघांवरही समान असेल. दंडाची रक्कम वाढवण्याबाबत विचार सुरू आहे. हेल्मेट वापराबाबत महत्त्वाची माहिती
हेल्मेटचे आयुष्य किती
ब्रँडेड हेल्मेट टिकाऊ असते. अपघातामुळे आतील भाग खराब झाला तर लगेच बदलावे. वायजर खराब झाल्यास ते बदलून नवे घालावे, कारण अस्पष्ट वायजर अपघातास कारणीभूत होऊ शकते.
नॉन-ब्रँडेड हेल्मेट नको
नॉन-ब्रँडेड हेल्मेट 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे असेल तर ते सुरक्षित नाही. आयएसआय मार्क असलेले हेल्मेटच वापरा हेल्मेटचे वायजर न तुटणारे व स्पष्ट दृष्टी देणारे असावे.