महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टपासून लागू; धर्मांतरासाठी 60 दिवस आधी सूचना बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 पासून या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. यासंदर्भातील राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाच्या मार्च 2026 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेसह विधान परिषदेत मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. जबरदस्ती, […]

अधिक वाचा..

मराठी सक्तीची नाही, स्वेच्छेने स्वीकारा’; एकनाथ शिंदेंचा भाषेच्या सन्मानाचा संदेश

ठाणे: मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा आहे. अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठीचा स्वीकार करणे हीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागासह राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या **‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा […]

अधिक वाचा..

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (E-KYC), आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅक (Agristack) नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS […]

अधिक वाचा..

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा, यासाठी वेतन संहिता (Code on Wages), 2019 अंतर्गत महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. या नियमांनुसार, महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देणे अपेक्षित असून, नोकरी सोडल्यानंतर Full & Final (F&F) सेटलमेंट दोन कामकाजाच्या दिवसांत पूर्ण करण्याची तरतूद आहे. पगारासंदर्भातील नियमांनुसार, […]

अधिक वाचा..

रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विविध साहित्य […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी बंधनकारक; उद्योग व खासगी आस्थापनांना शासनाचे आदेश

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले […]

अधिक वाचा..

पदोन्नतीसाठी टीईटी सक्तीची! हजारो ज्येष्ठ शिक्षकांसमोर मोठे आव्हान

माजलगाव: शिक्षक पदोन्नतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला कायदेशीर व प्रशासकीय संभ्रम अखेर दूर झाला असून, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी या पदांवरील पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात स्पष्ट आदेश जारी केल्याने बीड जिल्ह्यातील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो ज्येष्ठ शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताकदिनी राज्यातील सर्व शाळांमध्ये सामूहिक कवायत संचलन अनिवार्य

१०० टक्के विद्यार्थी उपस्थितीचे उद्दिष्ट; सुट्टी देऊ नये; शिक्षण आयुक्तांचे आदेश मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये येत्या प्रजासत्ताकदिनी (ता. २६) देशभक्तिपर गीतांवर आधारित सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य असल्याचे आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती राहील याची दक्षता शाळांनी घ्यावी, […]

अधिक वाचा..

मुख्याध्यापकांसह शिक्षकांसाठीही ‘टीईटी’ बंधनकारक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्षण विभागाची स्पष्टता सोलापूर: इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, हा निर्णय केवळ शिक्षकांसाठी असून मुख्याध्यापकांना लागू नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. यावर आता माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडत मुख्याध्यापकांनाही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे […]

अधिक वाचा..

दस्त नोंदणीच्या आधी जमीन मोजणी बंधनकारक; नोंदणी झाल्याशिवाय फेरफार नाही

औरंगाबाद: आता महाराष्ट्रात जमीन खरेदी-विक्री किंवा दस्त नोंदणी करण्याआधी जमिनीची मोजणी करणे बंधनकारक असेल कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ही नवी पद्धत लागू केली जाणार आहे. खासगी एजन्सीमार्फत जमिनीची मोजणी राज्यात जमाबंदी आयुक्तालयांच्या अखत्यारित १० ते १५ खासगी एजन्सी नेमल्या जाणार आहेत. या एजन्सींच्या भूकरमापकांमार्फत जमिनीची मोजणी केली जाईल. मोजणी पूर्ण झाल्यानंतरच दस्ताची नोंदणी […]

अधिक वाचा..