मुंबई: राज्य सरकारने काढलेल्या जीआर मुळे ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे. ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडत आहे तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी. ओबीसी विरोधातील हा शासन निर्णय कोण रद्द करणार, कधी करणार असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलतानाडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना पाडा असे आवाहन भुजबळ करत असतील तर मग सरकारच पाडले पाहिजे, ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा शासन निर्णयच सरकारने काढला आहे. त्या मंचावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गेले होते. एकीकडे छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणार दुसरीकडे टीका करायची हा दुटप्पीपणा आहे. ओबीसी आरक्षणाला जर धक्का लागत नाही तर सरकारने सर्व नेत्यांना बोलवावे चर्चा करावी मग आम्ही पुरावे देऊ ओबीसींचे काय नुकसान होत आहे अस वडेट्टीवार म्हणाले. महायुती सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे मराठवाडा पेटला आहे ओबीसी विरुद्ध मराठा पुन्हा वाद वाढला आहे. शाळांमधून विद्यार्थ्यांना काढले जात आहे इतका दोन समाजात द्वेष पसरला आहे. या सरकारला महाराष्ट्राचा विकास करायचा नाही पण जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्र खड्ड्यात घालत आहे असा हल्लाबोल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर केला.
भाजप आमदार पडळकर यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. पडळकर यांनी जी टीका केली ती म्हणजे आईला शिवी दिली आहे. राजकीय पुढाऱ्यांवर टीका करा पण त्यांच्या आई वडिलांवर बोलणे, अयोग्य आहे ,महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदा घडत आहे. पडळकर कुणाच्या इशाऱ्यावर बोलत आहे,कोण त्याला पाठीशी घालत आहे असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.