संविधान दिनानिमित्त टिळक भवन येथे २६ नोव्हेंबर रोजी विशेष व्याख्यान

महाराष्ट्र

मुंबई: भारतीय संविधान दिनानिमित्त बुधवार (दि. २6) नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे ‘प्रजासत्ताक आभास का वास्तव’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध घटना तज्ज्ञ व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे हे प्रमुख वक्ते आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व वक्ते ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार पद्मश्री कुमार केतकर आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून कार्यक्रमाचे सूत्र संचालन ॲड. भाऊसाहेब आजबे व ॲड. संदेश कोंडविलकर करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे संयोजक व समन्वयक विश्वास उटगी यांनी दिली आहे.