काँग्रेस पक्ष राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जनसुरक्षा कायद्याची होळी करणार: हर्षवर्धन सपकाळ

सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना नक्षलवादी ठरवून जेलमध्ये टाकण्याच्या उद्देशानेच कायदा केला  मुंबई: अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून […]

अधिक वाचा..

तुकडेबंदी कायदा रद्द; आता 1, 2, 3 गुंठे जमिनीची विक्री कायदेशीर

संभाजीनगर: राज्याच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची ऐतिहासिक घोषणा* केली आहे. या निर्णयामुळे सुमारे ५० लाख नागरिकांना थेट फायदा होणार असून, वर्षानुवर्षे अडकलेली शेतीविक्रीची प्रकरणं मार्गी लागणार आहे. काय होता तुकडेबंदी कायदा महाराष्ट्र शासनाच्या १२ जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार, १, २, ३ गुंठ्यांमध्ये शेतीजमीन खरेदी-विक्रीस बंदी होती. यामुळे विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी किंवा […]

अधिक वाचा..

पॉक्सो कायद्यांतर्गत तातडीने कार्यवाही करा

कोंढवा परिसरात स्कूल बस चालकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश पुणे: पुणे शहर परिसरात महिला आणि लहान मुलींवर विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, एकंदरितच पुणे शहर व ग्रामीण परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. अशीच आणखी एक संतापजनक घटना कोंढवा परिसरात घडली आहे. येथे एका शाळकरी मुलीवर […]

अधिक वाचा..

विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत पोलिसाकडून अश्लील कृत्य

पुणे: विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या नराधम पोलीस सचिन सस्ते हा लघुशंकेचा बहाणाकरून हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी […]

अधिक वाचा..

नगरच्या नामकरणाचे स्वागतच पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे नाव तर बदलले पण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीने समाजकार्य केले, सर्वधर्म समभावाला घेऊन पुढे गेल्या, त्या विचारांवर शिंदे-फडणवीस सरकारने काम करावे, असे […]

अधिक वाचा..

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार ‘हम करेसो कायदा’…

मुंबई: राज्यात भाजपाप्रणित सरकार आल्यापासून जनतेच्या पैशाची लूट सुरु आहे. मागील ९-१० महिन्यात शिंदे फडणवीस सरकारने तिजोरी लुटण्याचे काम केले आहे. जी-२० परिषदेच्या बैठकांवर वारेमाप पैशांची उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. दिल्लीत अदानीच्या रुपाने तर राज्यात अजय अशरच्या रुपाने सरकारी तिजोरी लुटण्यासाठी बसवले आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा…

नागपूर: विदर्भाच्या सर्वंकष विकासासाठी फक्त घोषणा नको तर कृती होण्याची गरज आहे, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व विदर्भावर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा असे स्पष्ट प्रतिपादन विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विदर्भातील अनुशेषावर भाषण करताना केले. विदर्भ मराठवाड्याचा सातत्याने असणारा अनुशेष यावर चर्चा करत असतांना विदर्भाकडे होणारे दुर्लक्ष दूर व्हावे व विदर्भाचा विकासाचा अनुशेष […]

अधिक वाचा..

विद्युत कायद्यातील सुधारणा ग्राहक हिताच्या; नितीन महाजन

शिक्रापूर (शेरखान शेख): वीज कायदा २०२१ मधील सुधारणा ग्राहक हिताच्या असून नियमित वीज बिल भरणाऱ्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी महावितरण सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरुर तालुका व तहसील कार्यालय अन्न नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग […]

अधिक वाचा..