अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार सत्तेच्या केंद्रस्थानी; पक्षातील नेते-मंत्र्यांशी थेट संवाद

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा कारभार हाती घेतला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांचे महाराष्ट्रला भावनिक आवाहन; म्हणाले…

पुणे: बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचारासाठी निघाले होते. सकाळी 8.15 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात, सकाळी 8.45 च्या सुमारास बारामतीच्या धावपट्टीजवळ विमान कोसळले.  या दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. राज्यासाठी हा केवळ अपघात नव्हता, तर प्रभावी नेतृत्व अचानक हरपल्याचा […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्यावे; आमदार अमोल मिटकरी यांची मागणी

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ मुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला असून, वाढत्या राजकोषीय तुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारने खर्चावर कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 फेब्रुवारी 2026 नंतर कोणत्याही नवीन खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट आदेश वित्त विभागाने दिले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली […]

अधिक वाचा..

अजित पवारांची भर कार्यक्रमात नाना पाटेकरांनी घेतलेली दादांची फिरकी

मुंबई: नियतीचा खेळ खरोखरच अजब असतो. २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत करून गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य अजूनही सुन्न आहे. शासकीय इतमामात पार पडलेले अंत्यसंस्कार, उसळलेला जनसागर आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यांतलं दुःख—या साऱ्यांतून दादांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. मात्र, राजकीय वलयाच्या पलीकडे अजित पवार यांचा […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनाचा निवडणुकांवर परिणाम? सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात प्रवेश करणार

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पवार कुटुंबीय दुःखातून सावरत हळूहळू राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

सिंचन घोटाळ्याची फाईल आणि रहस्यमय मृत्यू! अजित पवारांच्या मृत्यूवर संसदेत संशयाचा बॉम्ब

नवी दिल्ली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत संशय व्यक्त करत हा मुद्दा थेट संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. इतक्या तडफदार आणि दमदार नेत्याचा अकाली मृत्यू होणं ही अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी बाब असल्याचं राऊत यांनी सांगितलं. राज्यसभेतील भाषणात संजय राऊत म्हणाले, “मला अजित पवारांची आठवण […]

अधिक वाचा..

भाजपशिवाय राष्ट्रवादीचे विलीनीकरण अशक्य; अजितदादांनंतर नेतृत्वावरही भुजबळांचे मोठे संकेत

नाशिक: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी जनसागर उसळला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भवितव्याबाबत आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे.या चर्चांवर ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना अत्यंत स्पष्ट आणि […]

अधिक वाचा..

अमर रहे… अजितदादा अमर रहे! बाणगंगा तलावात विधीपूर्वक अस्थींचे विसर्जन

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज वाळकेश्वर येथील पवित्र बाणगंगा तलावात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले.यावेळी “अमर रहे… अमर रहे… अजितदादा अमर रहे…” अशा भावनिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व […]

अधिक वाचा..

अजित पवारांना दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली! अंतर्गत राजकारण कारणीभूत;  बबनराव पाचपुते यांचा दावा

मुंबई: भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्रीपदाची स्पष्ट संधी मिळूनही ती राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळे हुकल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत काम केलेल्या पाचपुते यांनी यासंदर्भात अनेक आठवणींना उजाळा दिला. बबनराव पाचपुते हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मंत्री होते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राने राजासारखं मन असलेला नेता गमावला; अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करताना प्रशांत जगताप भावुक

मुंबई: महाराष्ट्राचे लाडके नेते, आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. दादांच्या जाण्याचा धक्का आजही स्वीकारणं कठीण असल्याचं सांगत माजी महापौर प्रशांत जगताप यांनी ज्या ठिकाणी अजितदादांना मुखाग्नी देण्यात आला, त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दादांसोबतच्या २४ वर्षांच्या सहवासातील असंख्य आठवणी मनात दाटून आल्याने प्रशांत जगताप भावुक झाले. […]

अधिक वाचा..