महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करा

ठाणे: कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती कार्यरत असते. शासन निर्णय क्र.मकची-२०१४/ प्र.क्र.६३/ मकक दि.११ सप्टेंबर, २०१४ अन्वये जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी खालीलप्रमाणे अनुभव असलेल्या व्यक्तींकडून […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत; आदित्य ठाकरे

मुंबई: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवायला पाहिजे होतं, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात 750हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ज्या विधानभवनात कृषी […]

अधिक वाचा..

अखेर उद्धव ठाकरेंची ती इच्छा पूर्ण, इंडिया आघाडीच्या बैठकीतून मोठी बातमी

मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला 24 पक्षांची उपस्थिती होती. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत पावसाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे […]

अधिक वाचा..

धाकट्या भावाच्या युतीवर प्रकाश आंबेडकर प्रचंड संतापले

मुंबई: शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांची युती झाल्याचे जाहीर केले. पण त्यानंतर चार तासांतच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर सडकून टीका करत हल्लाबोल चढवला आहे. ही युती म्हणजे आंबेडकरविरोधी असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडीने याबाबतचे एक […]

अधिक वाचा..

ठाकरे बंधूंच्या युतीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात ठाकरे बंधू आता कधी एकत्र येतील याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. रोज नव्याने येणाऱ्या मुद्द्यांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल अनेक राजकीय […]

अधिक वाचा..

ठाकरेंची युती होण्याआधीच फिस्कटली

मुंबई: भाषेच्या मुद्द्यावरुन 5 जुलै रोजी 19 वर्षानंतर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे राजकीय युती करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ठाकरे बंधु एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार? दोन्ही भाऊ एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार का? असे प्रश्न विचारले जात असतानाच या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी […]

अधिक वाचा..

महाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली

नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले मुंबई: पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाढे ५५ असे […]

अधिक वाचा..

सत्ताधारी भाजपा युतीला महाराष्ट्राचा तालाबीन करायचा आहे का

मुंबई: हास्यकलाकार कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर ओढवून घेऊन तोडफोड केली. हल्ला करणारे सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा सरकार, संविधान, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का, त्यांना कायदा हातात का घेतला. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडलेला हा उच्छाद पाहून […]

अधिक वाचा..

महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर दाखवायचं आणि तोंडाला पाने पुसायची

मुंबई: महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा स्वप्न विकणारा, पण जमिनीवर कोणताही आधार नसलेला आहे. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन जनतेला फसवणाऱ्या सरकारने आता अर्थसंकल्पाच्या नावाने लोकांची दिशाभूल केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे “नुसताच तोंडाचा पट्टा आणि काम शून्य” आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी थाप. कर्जमाफीचा फसवा ढोल निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देऊ म्हणणारे आता गप्प का?”हातातोंडाशी आलेला […]

अधिक वाचा..

महायुती सरकारमधील कृषी खात्यातील घोटाळ्यावर सरकार गप्प का

मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या काळातील कृषी विभाग हा शेतकऱ्यांसाठी नाही तर अधिकारी व मंत्री यांचे खिसे भरण्यासाठीच काम करत होता असे विविध घोटाळ्यांवरून दिसत आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानावर पुरवल्या जाणाऱ्या कीटकनाशक खरेदीतही गैरव्यवहार करण्यात आला आहे. २५.१२ कोटी रुपयांच्या खरेदीत २०.६७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराशी संबंधित अधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा..