राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरु करून भाजपा युती कडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम

मुंबई: राज्यात जवळपास २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद ही रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरु करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या […]

अधिक वाचा..

जाती-धर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा

उमरखेड: विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागल्याने ते हिंदू-मुस्लीम करत आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन करत मविआ जिंकली तर दिल्लीतील नरेंद्र […]

अधिक वाचा..

कल्याणकारी योजना काँग्रेस आघाडी बंद करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

करमाळा: काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यास कल्याणकारी योजनांची चौकशी लावून त्या बंद करतील, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सोलापूर दौऱ्यावर आज मुख्यमंत्र्यांच्या करमाळा, बार्शी आणि धाराशीवमधील, परंडा आणि कळंबा येथे झंझावाती प्रचार सभा पार पडल्या त्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, महायुतीने लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिले आहे. लाडकी बहिण योजनेविरोधात […]

अधिक वाचा..

महिलांच्या सुरक्षेसह त्यांच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध

नाशिक: महिलांच्या सुरक्षा संदर्भात केंद्र सरकारने नवीन आचारसंहिता आणलेली आहे. लवकरच दिशा कायद्याचीदेखील अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती देतानाच शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, अनेकदा महिलांना कामाच्या ठिकाणी असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते, हे लक्षात घेऊन अंगणवाडी सेविकांच्या कामाच्या ठिकाणी पॅनिक बटन बसविण्याची मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती डॉ गोऱ्हे यांनी दिली. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार भाजपा युतीला घरचा रस्ता दाखवा अन्यथा…

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यापासून मागील १० वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नव्हता तर वस्तुस्थिती आहे यावर केंद्रातील भाजपा सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच हा अहवाल दिला असून राज्यातील शिंदे भाजपाचे गुजरात धार्जिणे सरकार व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिके मुळेच महाराष्ट्राची अधोगती झाल्याचा घणाघाती हल्लाबोल […]

अधिक वाचा..

मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी ठरेल; नाना पटोले 

मुंबई: काँग्रेस कोअर कमिमीच्या बैठकीत मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे दोन प्रतिनिधीही उपस्थित होते. मुंबईत होणाऱ्या बैठकीचा आढावा घेण्यात आला आहे. या महत्वपूर्ण बैठकीतून देशात एक संदेश गेला पाहिजे त्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी […]

अधिक वाचा..

उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी महिला आघाडी सक्षम करा; ज्योती ठाकरे

मुंबई: जालना तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख ज्योती ठाकरे यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर उपतालुकाप्रमुख सखाराम गिराम, विष्णुपंत गिराम, जनार्दन गिराम, माजी नगरसेविका गंगुताई वानखेडे मंजुषा घायाळ, मंगल मेटकर, श्रीमती अंजली बनसोडे, संगीता सानप यांच्यासह भागवत गिराम यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना महिला […]

अधिक वाचा..

वंचित बहुजन आघाडीच्या शिरूर तालुका उपाध्यक्षपदी शरद उघडे यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका वंचित बहुजन आघाडीची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी मध्ये शिरुर तालुका बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षपदी कवठे येमाई येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे शरद लक्ष्मण उघडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अमर सुरेश उघडे यांची शिरुर तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना या निवडीचे नियुक्तीपत्र […]

अधिक वाचा..

आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल…

मुंबई: आज राज्याच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. न्यूज एरिना इंडियाने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांची खरी भावना दिसून येत नाही, असे स्पष्ट मत महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे. […]

अधिक वाचा..

आता महाविकास आघाडीचेच दिवस येणार; धनंजय मुंडे

परळी: महाविकास आघाडी राज्यात एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असे मत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी परळी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. धनंजय मुंडे यांनी खा.संजय राऊत यांचे स्वागत करताना स्वतःच्या […]

अधिक वाचा..