मोसंबीला लागलेल्या बुरशी रोगाची अंबादास दानवे यांनी केली पाहणी

जालना: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बहिरगड गावात राहणाऱ्या राधाकिसन दिवटे या शेतकऱ्याच्या मोसंबी बागेची पाहणी आज (दि. 28) रोजी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मोसंबीला बुरशी रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले नाही. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दानवे […]

अधिक वाचा..

भुकेने मरणारे लोक हे चिंतेची बाब, केंद्राने आत्मपरीक्षण करण्याची गरज: अंबादास दानवे

मुंबई: देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आपण “हर घर तिरंगा” मोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम हाती घेताना आपल्या देशात अंबानी अदानी सारखे अब्जाधीश लोक राहतात. त्याप्रमाणे हजारो लोक हे भुकेने मरत आहे ही चिंतेची बाब असून या परिस्थितीचा विचार केला पाहिजे, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारला टोला लगावताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वातंत्राच्या […]

अधिक वाचा..

कायदा सुव्यस्थेची लक्तरे वेशीवर, कायद्याचा गुन्हेगारांना धाक नाही: अंबादास दानवे

मुंबई: राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढारलेल्या महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिला नाही. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आणि गृहमंत्र्यांच्या नागपुरात महिला आणि सामान्य नागरिकच सुरक्षित नाहीत तर राज्यातील जनतेची काय स्थिती असेल असा रोखठोक प्रश्न करीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला चढविला. “महाराष्ट्रात दिवसाढवळ्या अपहरण, बलात्कार, लूटमार, फसवणुकीसारख्या घटना घडत आहेत. […]

अधिक वाचा..