धारीवाल वीज प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील धारीवाल वीज प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याची आग्रही भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली. धारीवाल वीज प्रकल्पाने वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणीसाठयासाठी एकच तळे बांधून साठवणूक केली. त्यामुळे जिल्ह्यातील येरुर व सोनेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पाणी साठा तळ्याची दानवे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी […]

अधिक वाचा..

अंबादास दानवे यांना क्रांतीचौक येथील कार्यालय रिकामी करण्याबाबत बँकेची नोटीस…

शिर्डी: औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील इमारतीचे शासनाकडे हस्तांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या इमारतीत भाडेकरु असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मातृभूमी ट्रस्टसह 22 भाडेकरूंना गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बँकेचे अवसायक यांनी पाठवल्या आहेत. त्यामुळे आता दानवे यांना आपलं कार्यालय इतर ठिकाणी हलवण्याची वेळ आली आहे. तर सरकारने गाळेधारकांना ती इमारत विकावी […]

अधिक वाचा..

पोलीस ठाण्याबाहेर केलेल्या गोळीबार प्रकरणी आमदारांना त्वरित अटक करावी…

मुंबई: गेल्यावर्षी गणेश विसर्जनादरम्यान पोलीस ठाण्याबाहेर जमावाच्या दिशेने केलेल्या गोळीबार प्रकरणी घटनास्थळावरुन जप्त केलेले काडतुस हे आमदार सदा सरवणकर यांच्या जप्त केलेल्या परवानाधारक बंदूकीतील असल्याचे कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बॅलेस्टिक अहवालातून सिद्ध झाले आहे त्यामुळे दोषी असलेल्या आ. सरवणकर यांना अटक करुन या गोळीबाराचा तपास जलद गतीने करण्यात यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षण पोषण आहारातील प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे…

नागपूर: शालेय शिक्षण पोषण आहारातील ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान सरकारने त्वरित द्यावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. त्यावर अधिक माहिती देताना दानवे म्हणाले की, शालेय शिक्षण पोषण आहारासंदर्भात यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री यांची भेट देखील घेतलेली आहे. शालेय पोषण आहाराचे एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंतचे ७० टक्के […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत, पीक विमा, मंत्र्यांचा भ्रष्टाचार प्रकरणी सरकारला धरले धारेवर…

नागपूर: अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मिळालेली तुटपुंजी मदत, पीक विम्या कंपन्यांची दादागिरी, राज्यातून गेलेले उद्योग, मंत्र्यांचे समोर आलेले भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात पेरणी केली मात्र पाऊसच झाला नाही, नंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने उभी पिकं […]

अधिक वाचा..

कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज…

नागपूर: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही कर्नाटक सरकार दुटप्पी भूमिका अवलंबत आहे. त्यामुळे आता मराठी बांधवांच्या संरक्षणासाठी सरकारने खंबीर भूमिका घेतली पाहिजे, कर्नाटकला ईट का जवाब पत्थर से देण्याची गरज आहे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केली. आज महाराष्ट्र बेळगाव एकीकरण समितीने आयोजित मोर्च्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेश […]

अधिक वाचा..

सरकारच्या निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे पूरग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब का?

नाशिक: राज्य सरकारचा निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेमुळे नाशिकसह राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते दानवे यांनी सोमवार (दि.5) सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील ता. वांजरवाडी व सिन्नर येथील मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला त्यावेळी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. एकप्रकारे […]

अधिक वाचा..

अंबादास दानवे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट…

संभाजीनगर: शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. सत्तेत आल्यावर राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दानवे हे रविवार (दि. ४) सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या […]

अधिक वाचा..

मोसंबीला लागलेल्या बुरशी रोगाची अंबादास दानवे यांनी केली पाहणी

जालना: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बहिरगड गावात राहणाऱ्या राधाकिसन दिवटे या शेतकऱ्याच्या मोसंबी बागेची पाहणी आज (दि. 28) रोजी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मोसंबीला बुरशी रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले नाही. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दानवे […]

अधिक वाचा..

भुकेने मरणारे लोक हे चिंतेची बाब, केंद्राने आत्मपरीक्षण करण्याची गरज: अंबादास दानवे

मुंबई: देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आपण “हर घर तिरंगा” मोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम हाती घेताना आपल्या देशात अंबानी अदानी सारखे अब्जाधीश लोक राहतात. त्याप्रमाणे हजारो लोक हे भुकेने मरत आहे ही चिंतेची बाब असून या परिस्थितीचा विचार केला पाहिजे, अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारला टोला लगावताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वातंत्राच्या […]

अधिक वाचा..