ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन ब्रह्मपुरी: केंद्र आणि राज्य सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे ब्रह्मपुरी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी […]

अधिक वाचा..

सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात; मीरा भाईंदर जमीन प्रकरणावरून सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर: मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदरमधील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केला. कोट्यवधी रुपयांची सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी नागपुरात केला. […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाच्या कारभारावर काँग्रेसचा हल्ला; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने परिवहन विभागावर जोरदार टीका करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत निवेदन जारी करून राज्य सरकार रस्ता सुरक्षेबाबत पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप केला. मुरबाड–कल्याण मार्गावरील इको कार अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांना काँग्रेसकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. […]

अधिक वाचा..

निधी वाटपात पक्षपातीपणा; आदिवासी निधी वळवण्यावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला

मुंबई: राज्यातील महायुती सरकार निधी वाटपात पक्षपातीपणा करत असून अर्थसंकल्पातील निधी केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातच दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. “सबका साथ, सबका विकास” ही घोषणा फक्त घोषणेतच राहिली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्पीय चर्चेत वडेट्टीवारांचा सरकारवर हल्ला

महसूल, शिक्षण, वन व वैद्यकीय शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश मुंबई: विधानसभेत अर्थसंकल्पावरील विभागवार चर्चेदरम्यान काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी महसूल, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि वन विभागातील अनागोंदी कारभार, वाढता भ्रष्टाचार आणि प्रलंबित जनहिताच्या प्रश्नांवरून सरकारला जोरदार धारेवर धरले. विविध विभागांतील गैरव्यवहार आणि प्रशासनातील ढिसाळपणाची त्यांनी सभागृहात सविस्तर पोलखोल केली. महसूल विभागावर बोलताना राज्यातील […]

अधिक वाचा..

पुणे-सोलापूर महामार्गावर बनावट फायनान्स टोळीचा धुमाकूळ; वाहनचालकांना अडवून मारहाण

पुणे: पुणे सोलापूर हायवेवर वर बनावट फायनान्स कंपनीचे नाव सांगत वाहनचालकांना अडवून दमदाटी, मारहाण आणि लूटमार करण्याचे प्रकार वाढले आहेत. ही टोळी सध्या यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्रिय असल्याची माहिती समोर आली असून, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटस टोलनाक्याजवळ थरारक प्रकार २२ फेब्रुवारी रोजी Patas टोलनाक्यापासून ते यवत गावादरम्यान एका दुचाकीवरून आलेल्या दोन […]

अधिक वाचा..

राज्यपालांच्या अभिभाषणावर काँग्रेसचा जोरदार हल्ला; ‘५ ट्रिलियन’ गप्पांवर विजय वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई: राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसने विरोध दर्शवला. चर्चेदरम्यान वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचा अवमान करायचा, हे या […]

अधिक वाचा..

मंत्रालयातील ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; चहापानावर बहिष्कार

मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या कथित भ्रष्ट कारभाराचा निषेध करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित अधिकृत चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मंत्रालयात सुरू असलेल्या ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकारावरून तसेच घटनात्मक पदांच्या कथित अवमानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबतही प्रश्न उपस्थित केले. हा घातपात की अपघात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी […]

अधिक वाचा..

राहुल गांधी यांचा मोदींवर हल्ला, भारत-अमेरिका व्यापार करारावरून राजकारण तापले

युनाइटेड स्टेट्स सर्वोच्च न्यायालयाचा ट्रम्प यांच्या टॅरिफवर निर्णय अमेरिका: अमेरिका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सुपरिम कोर्ट ऑफ द युनाइटेड स्टेट्स यांनी आक्षेप घेतल्यानंतर भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. न्यायालयाने ट्रम्प यांनी लादलेले काही टॅरिफ बेकायदेशीर ठरवले असून, राष्ट्रपतींना अशा प्रकारे टॅरिफ लावण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच ट्रम्प […]

अधिक वाचा..

मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून नवा वाद; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकावरून राजकीय वाद चिघळला आहे. पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसल्याचे प्रकाशन संस्था पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता. दरम्यान, पेंग्विन रँडम […]

अधिक वाचा..