स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नागपुरात ४ व ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कार्याशाळेचे उद्घाटन, विजय वडेट्टीवार व डॉ. नितीन राऊत यांचेही मार्गदर्शनपर संबोधन मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महानगरपालिका क्षेत्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार आहेत. दिनांक ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता […]

अधिक वाचा..

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत तातडीने द्या मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्ज माफ करावे, वीज बिलाची थकबाकी माफ करावी […]

अधिक वाचा..

अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती व शेतीवर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर गंभीर संकट ओढावले आहे. सातत्याने सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे. गेल्या महिनाभरात राज्यात पूरस्थिती कायम असून १०० लाख […]

अधिक वाचा..

काँग्रेसची हाक, कोल्हापुरकरांनो मराठवाड्याला साथ देऊया; आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: सध्या मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे. त्यामुळे संकटग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने कोल्हापूरकरांना केले आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करुया हा मदतीचा […]

अधिक वाचा..

संविधान सत्याग्रह यात्रेसाठी काँग्रेस पक्षाची समिती गठीत

मुंबई: महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान नागपूरच्या दिक्षाभूमी ते सेवाग्राम दरम्यान संविधान सत्याग्रह यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची तयारी करण्यासाठी तसेच समन्वय साधण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारणीची बैठक संपन्न

मुंबई: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी दिलेला नारा “वोट चोर, गद्दी छोड“ नुसार आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सजग राहून कार्य करावे तसेच जनसुरक्षा कायदा, जो लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्याला अत्यंत मारक आहे, त्याविरोधात जनजागृती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास केशवराव औताडे यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या […]

अधिक वाचा..

मुंबईतील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणा – रुग्णांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठाम इशारा

मुंबई: मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महानगरात आरोग्यसेवा ही नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत समोर आलेले प्रकार हे फक्त निष्काळजीपणाचे नाहीत तर रुग्णांच्या जीवाशी केलेला थेट खेळ आहे.प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले व मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी उपआयुक्त (आरोग्य), श्री. शरद उखाडे यांची भेट घेऊन खालील तिन्ही गंभीर मुद्द्यांवर […]

अधिक वाचा..

सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार

RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का मुंबई: देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला […]

अधिक वाचा..

मंगळवारी १६ सप्टेंबरला टिळक भवनमध्ये काँग्रेसचा रोजगार मेळावा 

४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार, बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी मुंबई: राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढलेली असून शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे […]

अधिक वाचा..

जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांचे उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: राज्यातील भारतीय जनता पक्ष युती सरकारने शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोध पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या अत्याचारी विधेयकाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) शिवसेना (उबाठा), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षाने आंदोलनाची हाक दिली असून उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व तालुका व जिल्हा स्तरावर हे आंदोलन करण्यात […]

अधिक वाचा..