कऱ्हाड उत्तरेत काँग्रेसचा ‘करेक्ट कार्यक्रम’; अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

कऱ्हाड: राज्यापासून गावपातळीवर फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व नसल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसचा या गटात ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा आहे. कऱ्हाड उत्तर विधानसभा या मतदारसंघात सातारा, खटाव, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिका-यांची ११ व १२ ऑगस्ट रोजी दोन दिवसांची निवासी कार्यशाळा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या ऑनलाईन संबोधनाने कार्यशाळेचे उद्घाटन, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नवनियुक्त कार्यकारिणीची दोन दिवसांची निवासी कार्यशाळा पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे आयोजित केली आहे. दिनांक ११ व १२ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे या […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचे दोन दिवसीय शिबिर टिळक भवनात संपन्न

प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह विविध विषयातील तज्ञांचे शिबिरार्थींना मार्गदर्शन मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्या दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे करण्यात आले होते. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिबीराचे उद्घाटन केले तर प्रभारी रमेश चेन्नथला यांनी देखील व्हिडिओ काँफ्रन्सच्या माध्यमातून संवाद साधला. माजी खासदार कुमार केतकर यांनी समकालीन राजकीय […]

अधिक वाचा..

स्वाभिमान गहाण टाकलेल्या उबाठाला काँग्रेसने जागा दाखवली; शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे 

सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीसमोर उबाठा झुकले मुंबई: इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसणाऱ्या उबाठांनी स्वाभिमान गहाण टाकला, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या डॉ. प्रा. ज्योती वाघमारे यांनी आज केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात असताना दिल्लीसमोर झुकणार नाही, अशी भाषा करणारे उबाठा दिल्लीत सोनिया आणि राहुल गांधींसमोर मुजरा करायला […]

अधिक वाचा..

तेव्हा काँग्रेसचे २७ हजार बूथ एजंट काय करत होते, काँग्रेसने मतदारांचा अपमान बंद करावा; आशिष शेलार

मुंबई: काँग्रेस आणि विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा सातत्याने चालवलेला अपमान बंद करावा, जर निवडणुकांवर टीकाच करायची असेल तर प्रथम विधानसभेचा राजीनामा द्यावा, असे आव्हान भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिले आहे. लोकांनी मतपेटीतून दिलेला जबरदस्त धक्का काँग्रेस आणि माविआला पचवता आलेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या विचारातून बाबाजानी दुर्राणींचा काँग्रेस प्रवेश, मराठवाड्यात काँग्रेसला अधिक बळ मिळेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचा हजारो समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे ७ व ८ ऑगस्टला टिळक भवनमध्ये निवासी शिबीर

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिनांक ७ व ८ ऑगस्ट २०२५ रोजी पक्षाचे दादर येथील मुख्यालय टिळक भवन येथे नवनियुक्त ब्लॉक अध्यक्षांचे शिबीर आयोजित केले आहे. हे दोन दिवसीय निवासी शिबीर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून पक्ष […]

अधिक वाचा..

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन

पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांनी हिंदूंची माफी मागावी मुंबई: हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबई आणि ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या मागणीसाठी ठिय्या केला. […]

अधिक वाचा..

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

भाजपा युती सरकार बेशरम व लाचार, कोकाटेंचा राजीनामा न घेता क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; हर्षवर्धन सपकाळ मुंबई: राज्यातील भाजपा युती सरकार हे बेशरम व लाचार असून विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून क्रीडा मंत्रालय देऊन उचित सन्मानच केला आहे. आता रमी या खेळाला ऑलिंम्पिक दर्जा देतील व तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही […]

अधिक वाचा..

निर्दोष नव्हे तर पुराव्यांच्या अभावी सोडण्यात आलेले आरोपी, मालेगाव निकालानंतर कॉंग्रेसचा घणाघात

मुंबई: मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणाचा जवळपास 17 वर्षांनी निकाल लागला. पुराव्यांअभावी या प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचा निकाल लागला आहे. यानंतर एकीकडे महायुतीने कॉंग्रेसवर टीका केली असताना आता कॉंग्रेसनेही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एनआयएवर निशाणा साधला आहे. तसेच, […]

अधिक वाचा..