भाजप देशभर दंगली घडवण्याचा कट रचत आहे; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशभरात धार्मिक तेढ निर्माण करून २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवण्याचे षडयंत्र भाजपाकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून पश्चिम बंगालमधील दंगली ही त्याची सुरुवात असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईतील Tilak Bhavan येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, पाच […]

अधिक वाचा..

मानवतेसाठी बलिदान देणारा आदिल देशाचा जाज्वल्य दीप; कुटुंबाला शिवसेनेकडून नवे घर

जम्मू-काश्मीर: “धर्म, भाषा आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी स्वतःचा जीव अर्पण करणारा आदिल हा देशाच्या अस्मितेचा जाज्वल्य दीप आहे,” असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी काढले. पहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला दिलेले आश्वासन पूर्ण करत शिवसेनेकडून आर्थिक मदत आणि नवे घर सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमात शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

महिला आरक्षण विधेयकावरून देशात राजकीय गदारोळ

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान Narendra Modi यांच्या राजीनाम्याबाबत सोशल मीडियावर पसरवण्यात आलेली माहिती पूर्णपणे अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. १७ एप्रिल रोजी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) यासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयकाला आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते नामंजूर झाले. […]

अधिक वाचा..

युद्धाच्या छायेत भारताला दिलासा; होर्मुझ पार करून एलपीजीचे दोन टँकर जहाजे देशात

गुजरात: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या चिंतेमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची दोन मोठी एलपीजी वाहक टँकर जहाजे – ‘शिवालिक’ आणि ‘नंदादेवी’ – इराणजवळील धोकादायक ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ सुरक्षितपणे पार करून भारताच्या किनाऱ्यावर पोहोचली आहेत. ‘शिवालिक’ हे जहाज सोमवारी (१६ मार्च २०२६) गुजरातमधील मुंद्रा बंदरात दाखल होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

देशविरोधी बोलणाऱ्यांना २० वेळा नाही तर २०० वेळा रोखू; डॉ. श्रीकांत शिंदे

लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मांडली रोखठोक भूमिका नवी दिल्ली: भारत विरोधी आणि लष्कराच्या विरोधात जर कोणी बोलण्याची हिंमत केल्यास आमच्याकडून २० वेळा नाही तर २०० वेळा रोखलं जाईल, असा इशारा शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना दिला. लोकसभा अध्यक्षांविरोधात इंडि आघाडीने आणलेल्या अविश्वास ठरावाला खासदार डॉ. शिंदे यांनी विरोध […]

अधिक वाचा..

युद्धामुळे साखर निर्यात ठप्प; देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा होण्याची शक्यता

मुंबई: देशात सुरू असलेल्या साखर हंगामात मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम आता साखर उद्योगावर दिसू लागला आहे. अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली असून आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर परिणाम झाल्याने साखर निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सुमारे १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या हंगामात […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा भाजपावर जोरदार हल्ला; देश दोन विचारधारांच्या उंबरठ्यावर; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात सध्या दोन विचारधारांची स्पष्ट लढाई सुरू असून एक विचारधारा काँग्रेसची तर दुसरी भाजपाची आहे. संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशक भारत घडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर देश फक्त मुठभर लोकांच्या हाती असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा आणि मनुवादी विचारांना मानणारा भारत घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. चिपळूण […]

अधिक वाचा..

काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय, २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: काँग्रेस पक्ष देशात व राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. काँग्रेस हाच भाजपला पर्याय आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढेल, त्यासाठी जोमाने काम करा. २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी […]

अधिक वाचा..

भारत-अमेरिका व्यापार करारावरून देशात खळबळ; शेतकऱ्यांमध्ये भीती, सरकारकडून अद्याप तपशील गोपनीय

मुंबई: भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा झाल्यानंतर देशभरात राजकीय आणि आर्थिक चर्चांना उधाण आले आहे. केंद्र सरकारने या कराराला ‘ऐतिहासिक’ आणि ‘रणनीतिक’ असे संबोधले असले, तरी कराराचा अधिकृत मजकूर अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. संसदेला विश्वासात न घेता आणि शेतकरी संघटनांशी सखोल चर्चा न करता करण्यात आलेल्या घोषणेमुळे ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald […]

अधिक वाचा..

गेल्या पाच वर्षांत देशात किती सरकारी शाळा बंद? लोकसभेत प्रश्न, शिक्षण मंत्र्यांनी दिले आकडे

नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षांत देशभरातील सरकारी शाळांमध्ये काही प्रमाणात बदल झाला असून, अनेक शाळा बंद किंवा विलीन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत दिली. या आकडेवारीमुळे विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकसभेत उपस्थित झालेला महत्त्वाचा प्रश्न लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बिहारचे […]

अधिक वाचा..