भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने, महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने; देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने, तर महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विविध देशांचे महावाणिज्यदूत, राजनैतिक अधिकारी, वाणिज्यदूत, विविध देशांचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित […]

अधिक वाचा..

मुंबईत प्राइम फोकसचा अत्याधुनिक स्टुडिओ सुरू; सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठी चालना; देवेंद्र फडणवीस

मुंबई: गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘वेव्ह्स 2025’ परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या […]

अधिक वाचा..

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

‘देवाभाऊ’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील भूमिकेबाबत राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच त्यांच्या काका बाळासाहेब फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. “आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित संतोष […]

अधिक वाचा..

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने महाराष्ट्राच्या उद्योग, कृषी आणि निर्यात क्षेत्रासाठी जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली झाली आहेत. या करारामुळे राज्यात गुंतवणूक, रोजगार आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत आयोजित भारत-यूके व्यापक आर्थिक व व्यापार करार अंमलबजावणी […]

अधिक वाचा..

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विविध विधानांवर जोरदार टीका केली. देशातील गरिबी निर्मूलन झाल्याचा दावा करताना मोदी सरकारकडून ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य दिले जात […]

अधिक वाचा..

मालेगाव वादावरून राज्यात तणाव! देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट इशारा; अधिकृत भूमिका माझीच

मुंबई: मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांनी लावलेल्या टिपू सुलतान यांच्या फोटोवरून सुरू झालेला वाद आता अधिकच पेटला आहे. महापालिकेतील दालनात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जाऊन हनुमान चालिसा पठण केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, भाजप नेते व मंत्री नितेश […]

अधिक वाचा..

अधिवेशनात कर्जमाफीचा गजर; देवेंद्र फडणवीस यांची जून 2026 ची टाइमलाइन

मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या तापलेले असताना विरोधकांनी अवकाळी पाऊस, शेतकरी कर्जमाफी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (26 फेब्रुवारी) विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना कर्जमाफीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. शेतकऱ्यांना 15,472 कोटींची थेट मदत मुख्यमंत्री म्हणाले, “मागील वर्षी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने 15,472 […]

अधिक वाचा..

बीडच्या प्रश्नांसाठी मुंबईत धाव! देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकारण तापलं

बीड: मागील वर्षभरापासून बीड जिल्हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. वाढती गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, दहशत, महिलांवरील अत्याचार, खून आणि दरोडे यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याची टीका होत आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीसाठी अपहरण व निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वतःकडे […]

अधिक वाचा..

पार्थ पवारांच्या राज्यसभेवरून भाजप-राष्ट्रवादीत वाद! देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट भाष्य

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच, भाजपाने पार्थ पवारांना विरोध केल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत भाजपाने कोणालाही विरोध केलेला नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “भाजपाने […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही […]

अधिक वाचा..