महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ! महायुतीत तणाव; मंत्री भरत गोगावले यांचा भाजप-राष्ट्रवादीला थेट इशारा

रायगड: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड रायगड जिल्ह्यातून समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील तणाव उघडपणे समोर येऊ लागला असून, महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना थेट इशारा दिला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची […]

अधिक वाचा..

मुंबई–पुण्याच्या रांगेत कोकण! विरोधकांना विकासाच्या रणांगणात थेट आव्हान

रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र रत्नागिरी: कोकण आता मागे राहणार नाही. मुंबई, पुणे, नागपूरच्या पंक्तीत उभं राहणार! वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कोकणासाठी ‘गेम चेंजर’ ठरणाऱ्या महामार्ग, ग्रोथ सेंटर्स, पर्यटन हब आणि उद्योग प्रकल्पांची घोषणा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विरोधकांना आव्हान दिलं. “हे केवळ रस्ते नाहीत, हा कोकणाच्या भविष्याचा मार्ग […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात ७ जिल्हा परिषद, १४ पंचायत समिती जागांसाठी थेट, चौरंगी व पंचरंगी लढती

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी अंतिम टप्प्यात कमालीची राजकीय रंगत घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी तब्बल ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यात यंदा थेट लढतींसह […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! सोनाली राऊतच्या ‘ॲटीट्यूड’वर रितेश भाऊंचा संताप, थेट नॉमिनेशनचा इशारा

मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात पहिल्याच आठवड्यात मोठा वाद पाहायला मिळत आहे. स्पर्धक सोनाली राऊतच्या वागणुकीमुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी तिला कडव्या शब्दांत सुनावलं आहे. “हा ॲटीट्यूड घरी ठेवायचा, या घरात नाही” असे स्पष्ट शब्दांत सांगत रितेश भाऊंनी शिस्त आणि मर्यादांची आठवण करून दिली.शो सुरू झाल्यापासूनच रितेश […]

अधिक वाचा..

निवडून आलात म्हणजे हवेतील भाषा चालणार नाही; सहर शेख यांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा थेट इशारा

मुंब्रा पालिकेतील एआयएमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधातील वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सहर शेख यांनी “अहंकारी लोकांना जनतेने कसे हरवले ते पाहिले ना?” अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर […]

अधिक वाचा..

१ ऑगस्टपासून काय महाग, काय स्वस्त? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम! वाचा तुमच्या फायद्याची बातमी

नवी दिल्ली: प्रत्येक महिन्याची सुरुवात काही नवीन बदलांनी होते. आज म्हणजेच १ ऑगस्टपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलत आहेत, ज्यांचा थेट तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो.यामध्ये UPI वापराच्या नियमांपासून ते LPG गॅसच्या किमती आणि बँकिंग क्षेत्रातील बदलांचा समावेश आहे. हे बदल थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारे असल्याने, वेळेवर त्यांची माहिती घेणे आणि […]

अधिक वाचा..

वाळू तस्करांना दंड नाही तर थेट ‘एफआयआर’; महसूल विभागाचे नवे परिपत्रक

अधिकाऱ्यांवर राहणार जबाबदारी सोलापूर: वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उपसा, वापर व वाहतूक रोखण्यासाठी अशा व्यक्तींवर जबर कारवाई केली जाणार आहे. वाळू व इतर गौण खनिजाची अवैध/अनधिकृत उपसा, वापर, वाहतूक व तस्करीमध्ये आढळून आलेल्या व्यक्ती यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदीनुसार केवळ दंडात्मक कारवाई न करता संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई म्हणजेच एफआयआर दाखल […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा, ‘ही’ चूक केली तर निलंबन नाही तर थेट बडतर्फ

मुंबई: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध मुद्द्यांवर सविस्तर निवेदन मांडत आहेत. ते विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. तसेच ते विविध प्रश्नांवर भूमिका मांडत आहेत. राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. राज्यातील गुन्हेगारी ही गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेसहा टक्क्यांनी घटल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..

भारताचा पाकिस्तानवर थेट वार! पाणी बंद! व्हिसा बंद! बॉर्डर बंद

संभाजीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घातलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चपराक दिली आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सुरक्षा समितीनं घेतले निर्णय म्हणजे पाकिस्तानसाठी थेट इशारा! भारताचे ५ धडाकेबाज निर्णय – दहशतवाद्यांना थांबवा, नाहीतर परिणाम भोगा सिंधू जल करार ताबडतोब स्थगित पाकिस्तानला आता पाण्याचा थेंबही नाही भारताचं पाणी, भारतातच राहील. अटारी-वाघा सीमेवर कुलूप १ मेपूर्वी भारतीयांना […]

अधिक वाचा..