अनिशा माजगावकर पुन्हा मनसेत सक्रिय होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर भांडूपच्या राजकारणात खळबळ

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि भांडूपमधील मनसेच्या बंडखोर नेत्या अनिशा माजगावकर यांची आज महत्त्वपूर्ण भेट झाली. या भेटीत राज ठाकरे यांनी माजगावकर यांना पुन्हा पक्षात सक्रिय होण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात भांडूपसह मुंबईतील मनसेच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भांडूपच्या वॉर्ड क्रमांक ११४ वरून […]

अधिक वाचा..

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

दक्षिण रत्नागिरीतील भाजप संघटनेचे शिल्पकार हरपले; गुरुवारी मूळ गावी अंत्यसंस्कार मुंबई: राजेश सावंत यांच्या निधनाने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते कोल्हापूरहून रत्नागिरीकडे परत येत असताना पाली परिसरात त्यांना अचानक अस्वस्थता […]

अधिक वाचा..

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच मोठी घसरण झाली. सरकारने एलआयसीमधील हिस्सा ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) माध्यमातून सवलतीच्या दरात विकण्याची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. परिणामी, कंपनीचा शेअर एका टप्प्यावर सुमारे 9 टक्क्यांनी घसरला. केंद्र सरकारने एलआयसीमधील 6.5 टक्के हिस्सा विकण्याची योजना आखली आहे. […]

अधिक वाचा..

‘सिद्धिविनायक चोरीप्रकरणी मला माहिती नाही’; बांकीपूर पराभवानंतर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. या निकालामुळे विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढेल, असा दावा त्यांनी केला. मात्र, सिद्धिविनायक मंदिरातील कथित चोरीप्रकरणी प्रश्न विचारला असता, त्यावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. राऊत म्हणाले, “देशात सध्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]

अधिक वाचा..

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर चालत आदिवासी विकासासाठी सरकार कटिबद्ध; एकनाथ शिंदे

मुंबई: भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य, रोजगार, संस्कृती संवर्धन आणि हक्कांचे संरक्षण यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकभवनातील दरबार हॉल येथे राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

अधिक वाचा..

किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर

शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना कवठे यमाई हद्दीतील इचकेवाडी येथे घडली आहे. याबाबत कवठे यमाई (ता. शिरूर) येथील रहिवासी सुहास अनिल इचके (वय ३५, व्यवसाय-शेती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ३१ […]

अधिक वाचा..

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इत्यादींच्या पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच हे शक्य झाले असे सांगतानाच आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा कार्य करत आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी […]

अधिक वाचा..

‘१ मेपासून मराठी सक्ती’चा फुगा फुटला? विरोधानंतर सरकारची माघार

मुंबई: राज्यात ‘१ मेपासून मराठी सक्ती’ या घोषणेनंतर निर्माण झालेला वाद आता अधिकच गडद झाला आहे. परिवहन विभागाकडून करण्यात आलेल्या या घोषणेला सुरुवातीला मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांकडून तीव्र विरोध समोर आल्यानंतर सरकारची भूमिका नरम झाल्याचे दिसत आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाषा सक्तीच्या निर्णयाला विरोध करताना, यामुळे त्यांच्या रोजीरोटीवर परिणाम […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनानंतर तटकरे यांचा शांततेचा संदेश, कार्यकर्त्यांना संयमाचे आवाहन

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत, आणि या दुःखद घटनेचा राजकारणावरही प्रभाव जाणवत आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अजितदादांच्या पक्षातील काही वरिष्ठ नेते या विलीनीकरणास अनुकूल नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, पवार […]

अधिक वाचा..

लग्नानंतर पत्नीचा नकार; ७ महिने १६ दिवसांत न्यायालयाकडून विवाह रद्द

पतीने मानसिक धक्का बसल्यानंतर घेतली न्यायालयाची धाव मुंबई: देवाब्राह्मणांच्या साक्षीने व वाजतगाजत पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या विवाहानंतर अवघ्या काही दिवसांत पत्नीने नवरा पसंत नसल्याचा पवित्रा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आई-वडिलांच्या दबावाखाली लग्न केल्याचे पत्नीने लग्नानंतर तिसऱ्या दिवशीच स्पष्ट केल्याने पतीला जबरदस्त मानसिक धक्का बसला. अखेर न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर अवघ्या ७ महिने १६ […]

अधिक वाचा..