अजित पवारांच्या निधनानंतर तटकरे यांचा शांततेचा संदेश, कार्यकर्त्यांना संयमाचे आवाहन

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत, आणि या दुःखद घटनेचा राजकारणावरही प्रभाव जाणवत आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अजितदादांच्या पक्षातील काही वरिष्ठ नेते या विलीनीकरणास अनुकूल नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, पवार […]

अधिक वाचा..

लग्नानंतर पत्नीचा नकार; ७ महिने १६ दिवसांत न्यायालयाकडून विवाह रद्द

पतीने मानसिक धक्का बसल्यानंतर घेतली न्यायालयाची धाव मुंबई: देवाब्राह्मणांच्या साक्षीने व वाजतगाजत पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या विवाहानंतर अवघ्या काही दिवसांत पत्नीने नवरा पसंत नसल्याचा पवित्रा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आई-वडिलांच्या दबावाखाली लग्न केल्याचे पत्नीने लग्नानंतर तिसऱ्या दिवशीच स्पष्ट केल्याने पतीला जबरदस्त मानसिक धक्का बसला. अखेर न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर अवघ्या ७ महिने १६ […]

अधिक वाचा..

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर एकनाथ शिंदेंचा संवेदनशील निर्णय, वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा ९ फेब्रुवारीला आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेंनी आपल्या जवळच्या मित्र आणि सहकारी गमावल्याची व्यथा व्यक्त करत सर्व नियोजित सोहळे रद्द केले आहेत. त्यांनी सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले, “अजित पवार […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार सत्तेच्या केंद्रस्थानी; पक्षातील नेते-मंत्र्यांशी थेट संवाद

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा कारभार हाती घेतला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांचे महाराष्ट्रला भावनिक आवाहन; म्हणाले…

पुणे: बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचारासाठी निघाले होते. सकाळी 8.15 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात, सकाळी 8.45 च्या सुमारास बारामतीच्या धावपट्टीजवळ विमान कोसळले.  या दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. राज्यासाठी हा केवळ अपघात नव्हता, तर प्रभावी नेतृत्व अचानक हरपल्याचा […]

अधिक वाचा..

भाग्यश्री न्हाळवेच्या आईच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्व दुःखात

मुंबई: मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे यांची आई आजारीपणामुळे निधन झाली आहे. ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’, ‘रमा राघव’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ आणि ‘माटी से बंधी डोर’ या मालिकांमधून झळकलेली भाग्यश्रीने या दु:खद घटनेची माहिती स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. भाग्यश्रीने आपल्या पोस्टमध्ये भावनिक शब्दांत आईशी शेवटचा संवाद व्यक्त केला […]

अधिक वाचा..

पाबळ हादरले! घरगुती वादातून विवाहितेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या 

पाबळ (सुनिल जिते): पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), […]

अधिक वाचा..

मुंबई निकालानंतर काँग्रेसमध्ये वाद! वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची भाई जगताप यांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबईत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून अपेक्षेपेक्षा कामगिरी सुधारली असली तरी सत्तेच्या समीकरणात पक्षाची भूमिका मर्यादित राहिली आहे. निकालानंतर काही तासांतच काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही […]

अधिक वाचा..

कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता काम केल्याने अधिकाऱ्यांवर माफी मागण्याची नामुष्की

सरदवाडी ग्रामस्थांच्या लढ्याला मोठे यश; अनिल जाधव यांचे प्रतिज्ञापत्र चुकीचे ठरले शिरूर (अरुणकुमार मोटे): सरदवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थ रामदास सरोदे व इतर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) व एमआयडीसी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे झालेल्या सुनावणीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे. कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता […]

अधिक वाचा..