सरकारचा ऐतिहासिक निर्णय, शेततळे, विहीर बांधकामासाठी माती अन् खडीवरील रॉयल्टी माफ

राज्य सरकारचा मोठा निर्णय   मुंबई: राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकरी आणि घरकूल लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेततळे, विहीर बांधकाम किंवा शेत पाणंद रस्ता तयार करण्यासाठी लागणाऱ्या माती आणि खडीवर (गौण खनिज) रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा शेततळे, विहीर बांधकाम आणि शेत […]

अधिक वाचा..

शासकीय कामात अडथळा, शिरूरमध्ये पाणीपुरवठा कर्मचार्‍यावर हल्ला

आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरूणुकमार मोटे): शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या शासकीय पाणीपुरवठा योजनेसाठी चारी खोदण्याचे काम सुरू असताना एका इसमाने सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करत कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश माणिक कु-हाडे (वय ४१ वर्ष ) […]

अधिक वाचा..

एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्ससाठी महाराष्ट्र शासन,मायक्रोसॉफ्ट यांच्या दरम्यान सामंजस्य करार

मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात आज सामंजस्य करार झाला. हा करार महाराष्ट्र शासनांच्या वतीने मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे वेंकट कृष्णन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला पोलीस स्टेट बनवायचा सरकारचा प्रयत्न! कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का?

मुंबई: काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता, मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असे पण देवेंद्र फडणवीसांकडे गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रु, राज्य शासनाचा जीआर आला, वाचा सविस्तर

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ अंतर्गत सहाव्या हप्त्यासह काही थकीत हप्त्यांचे वितरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना 2000 रुपये थेट बँक खात्यात मिळणार असून, त्यासाठी 1642.18 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शासनाचा महत्त्वाचा निर्णय शेतकरी मित्रांनो, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात रस्ता खुला करताना सरकारी कामात आत्महत्येची धमकी देत अडथळा

शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर आदेशानुसार गावात जाणाऱ्या रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ग्रामस्थांनी या कामास तीव्र विरोध दर्शवला .व सरकारी कामात आत्महत्येची धमकी देत अडथळा निर्माण केला. याबाबत मंडलअधिकारी माधुरी बागले (वय ४४) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ नाव लावून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर प्रशासकीय इमारतीच्या वाहनतळावर एका खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव आढळल्याने वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी या गैरप्रकाराची तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुर्वीही वाळुंज यांच्या तक्रारीनंतर पुण्यातील एका मंडलाधिकार्‍यावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. शिरूर प्रशासकीय इमारतीतील वाहनतळावर (दि. […]

अधिक वाचा..

कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी

मुंबई: राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे, शांतता स्थापित करणे, त्याचबरोबर जनतेमध्ये सौहार्दाचे वातावरण राहील हे पाहण्याची संविधानिक जबाबदारी राज्य सरकारवर असते परंतु दुर्देवाने महायुती सरकार जाणिवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याकरिता धर्मांधतेचे विष पसरवत आहे. भाजपाच्या परिवारातील संस्था औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन करतात आणि मंत्री व मुख्यमंत्री वक्तव्ये करतात. राज्यातील आजची परिस्थिती पाहता राज्य सरकार कायदा सुव्यवस्था […]

अधिक वाचा..

OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा

मुंबई: ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शोजमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह, अयोग्य आणि संवेदनशील टिप्पण्या करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि समाजघटकांविषयी अनादराची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषद हद्दीतील शासकीय जागेचे संरक्षण कंपाऊंड वॉल तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषद हद्दीतील स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो) येथे उभारलेल्या सिमेंटच्या कंपाऊंड वॉलची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (दि. २२) मार्च २०२५ रोजी मध्यरात्री घडला असून, याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात शासकीय मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच, कचरा डेपो येथील कचऱ्याला […]

अधिक वाचा..