राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्यक परिक्षण अनुदानाचा पहिला हप्ता थेट ग्रंथालयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सार्वजनिक ग्रंथालये केवळ पुस्तके ठेवण्याची ठिकाणे नसून समाजातील वाचनसंस्कृती जोपासणारी प्रेरणास्थळे आहेत.या ग्रंथालयांना वेळेवर अनुदान उपलब्ध […]

अधिक वाचा..

पंकजा मुंडे यांच्या कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीवर सरकारने काय कारवाई केली

मुंबई: राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ओबीसी उपसमितीच्या सदस्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत आतापर्यंत मराठा समाजाला जे कुणबी, मराठा कुणबी,कुणबी मराठा दाखले दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याबाबत समितीचे एकमत झाल्याची भूमिका मांडली आहे. याबाबत सरकारने काय कारवाई केली अशी विचारणा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. राज्याचे इतर मागासवर्गीय व बहुजन […]

अधिक वाचा..

देवाभाऊ’च्या सरकारने पुढच्या एका महिन्यात कर्जमाफी केली नाही तर

मुंबई: शरद पवार कृषिमंत्री असताना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. शेतकरीआजअडचणीत असतानाअशीकर्जमाफी का होत नाही? इथले शेतकरी आम्हाला भेटले, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँ केचे 65 हजार सभासद आज अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा बॅंकेची चौकशी लावण्या चे काम आम्ही करू. शिवाय दिल्लीत आम्ही 8 खासदार या संदर्भात आवाज उठवू. हा मोर्चा म्हणजे एका […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद

मुंबई:राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेतर्फे दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाहीये. यामध्ये कोल्हापूरातील १७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. दरम्यान, शासनाच्या या निर्णयाना भारतीय मराठा महासंघाने विरोध केला आहे. शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णयाला अखिल भारतीय मराठा महासंघाने […]

अधिक वाचा..

माझी लेकर शिकतायत, मी मजुरी करतो पण हे सरकार प्रमाणपत्र देईना म्हणून हतबल बापाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन

लातूर: “माझी दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतोय पण हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी जीवन संपवतोय…”; अशी चिठ्ठी लिहित एका वडिलांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना लातूरच्या निलंगा तालुक्यातील दादगी गावात घडली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे अनेकजन आरक्षणासाठी आपलं […]

अधिक वाचा..

सरकारने ओबीसी समाजाचा केला विश्वासघात! त्या तरुणाने केलेल्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार

नागपूर: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदारी गावातील भरत कराड या ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. हे वृत्त धक्कादायक आहे. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निराशेने या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. गेले काही दिवस मुख्यमंत्र्यांपासून ते ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष सांगत आहे की सरकारच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येणार नाही पण हाच […]

अधिक वाचा..

ओबीसी समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध; ओबीसी आरक्षणाला धक्का नाही

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही. कुणबी असल्याचे पुरावे असणाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का बसणार नाही. शासनाच्या सर्व योजनांचा उद्देश ओबीसी समाजाला शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. शासन पूर्णपणे कटिबद्ध असून सर्व मागण्यांवर सकारात्मक पद्धतीने चर्चा करून […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचे होणार नुकसान

  मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जीआरने ओबीसी समाजाचे नुकसान होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता. पण दुसरा शासन निर्णय काढताना मात्र पात्र हा शब्द वगळण्यात आला. याचा अर्थ असा निघतो की मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण मिळू शकते. हे ओबीसी समाजावर अन्यायकारक […]

अधिक वाचा..

सरकारचा मोठा निर्णय!आता लोनसाठी सिबिल स्कोअरची सक्ती नाही

    मुंबई: सिबिल स्कोअर म्हणजे काय हे आज जवळपास सर्वांनाच ठाऊक आहे. बँकेतून गाडी, घर, मोटारसायकल किंवा कुठलाही लोन घेताना पहिलं पाऊल म्हणून बँक ग्राहकाचा सिबिल स्कोअर तपासते. जर स्कोअर चांगला असेल तर लोन सहज मिळतं, पण जर स्कोअर कमी असेल तर लोन नाकारलं जातं. पण आता सरकारकडून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारचा […]

अधिक वाचा..

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ओबीसी समाजासाठीही उप समितीची स्थापना, आजच GR निघणार

मुंबई: मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला होता. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू कऱण्यात आली होती. छगन भुजबळ, बबनराव तायवाडे, हाके, परिनय फुके यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली […]

अधिक वाचा..