मैथिली ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा; सरकारी रुग्णालय की मृत्यूचा सापळा…

बिहार: बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या प्रसिद्ध लोकगायिका आणि नवनिर्वाचित आमदार मैथिली ठाकूर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आले आहे. सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले. “कागदावर सर्व काही सुरळीत दाखवले जाते, पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत भयावह आहे,” अशा शब्दांत त्यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या लेखी उत्तराचा […]

अधिक वाचा..

मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून नवा वाद; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकावरून राजकीय वाद चिघळला आहे. पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसल्याचे प्रकाशन संस्था पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला होता. दरम्यान, पेंग्विन रँडम […]

अधिक वाचा..

मोफत उपचारांना ब्रेक! शासकीय रुग्णालयांत पुन्हा शुल्क; केसपेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत दर लागू

मुंबई: अडीच वर्षांपूर्वी राज्यात सुरू करण्यात आलेल्या ‘पूर्ण मोफत उपचार’ धोरणाला आरोग्य विभागाने अखेर यू-टर्न घेतला आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आता पुन्हा उपचारांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा व महिला रुग्णालयांपर्यंत नवे दर लागू होणार आहेत. बाह्यरुग्ण विभागातील केसपेपरसाठी ५ रुपये, तर सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी तब्बल ४० हजार रुपये मोजावे […]

अधिक वाचा..

लोकसभा दणाणली! कळीच्या मुद्द्यांवर चर्चेला टाळाटाळ करणाऱ्या सरकारविरोधात इंडिया आघाडी आक्रमक

नवी दिल्ली: घुसखोरीचा प्रश्न, अमेरिकेसोबतचा प्रस्तावित व्यापार करार तसेच इतर कळीच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा टाळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात आज इंडिया आघाडीने लोकसभेत जोरदार आक्रमक भूमिका घेतली. “हुकूमशाही खपवून घेणार नाही,” असा ठणकाव करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे काही काळ लोकसभा अक्षरशः दणाणून गेली. सरकार महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेला उत्तर देण्यास टाळाटाळ […]

अधिक वाचा..

मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे ठप्प; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सरकारवर टीका

पुणे: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर कडक टीका केली आहे. सपकाळ म्हणाले की, “१ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने पायाभूत सुविधांचे ढोल बडवत आहेत, पण मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे गेल्या २४ तासांपासून पूर्णपणे ठप्प आहे.” त्यांच्या मते, राज्यातील हा सर्वात महत्त्वाचा दळणवळण मार्ग ठप्प झाल्यामुळे हजारो वाहने आणि लाखो […]

अधिक वाचा..

२५ कोटींचा अतिवृष्टी अनुदान महाघोटाळा! सरकारी बाबूच बनले ‘शेतकरी’, ३१ जणांना अटक

जालना: नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असलेली सरकारी तिजोरीच लुटल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अपहार करण्यात आल्याप्रकरणी ३१ आरोपींना जालना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घोटाळ्यात चक्क तलाठी, तहसील कर्मचारी आणि संगणक तज्ज्ञांचा सहभाग असल्याने महसूल विभागात […]

अधिक वाचा..

गेल्या पाच वर्षांत देशात किती सरकारी शाळा बंद? लोकसभेत प्रश्न, शिक्षण मंत्र्यांनी दिले आकडे

नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षांत देशभरातील सरकारी शाळांमध्ये काही प्रमाणात बदल झाला असून, अनेक शाळा बंद किंवा विलीन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत दिली. या आकडेवारीमुळे विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकसभेत उपस्थित झालेला महत्त्वाचा प्रश्न लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बिहारचे […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी बंधनकारक; उद्योग व खासगी आस्थापनांना शासनाचे आदेश

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! कर्तव्यावर असताना एसटी प्रवास मोफत

राज्य शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी मुंबई: राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना एसटी बसने प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी प्रशासकीय पातळीवर झालेल्या बैठकीनंतर याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या निर्णयाचा मुख्य उद्देश काय […]

अधिक वाचा..

राज्य शासनाचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत घरपट्टी, नळपट्टी करामध्ये 50% सूट

औरंगाबाद: महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५–२६ साठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. घरपट्टी व पाणीपट्टीत मोठा दिलासा या अभियानाअंतर्गत घरपट्टी पाणीपट्टी यावर मिळणारी ५० टक्के सवलत पुढेही कायम राहणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. […]

अधिक वाचा..