आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकांबाबत गायकवाड यांनी केलेली भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत आणि गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचा आरोप त्यांनी केला. गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड […]

अधिक वाचा..

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन, अखलाख अहमद वाहिद उझमा, अकबर गुलाब शेख, फिरोझ अब्दुल रेहमान खान आणि फैजल खलील शेख […]

अधिक वाचा..

गांधी हत्या समर्थन असंस्कृत; जैन मुनीच्या वक्तव्यावर सपकाळ यांचा संताप

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. गांधी हत्या ही भारतीय संस्कृतीला धरून नसून अहिंसेच्या तत्वांना छेद देणारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. जैन धर्मातील अहिंसेच्या विचारांच्या विरोधात जाऊन जैन मुनीने असे वक्तव्य करणे अयोग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. गांधी हत्या प्रकरणात […]

अधिक वाचा..

महिला आरक्षणावर भाजपाला अधिकार नाही; RSS मध्ये महिला सरसंघचालक नेमून दाखवा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. “महिला आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला कोणताही अधिकार नाही. आधी Bunch of Thoughts आणि Manusmriti जाळा, मग बोला,” असे आव्हान त्यांनी दिले. टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, भाजपाची विचारसरणी M. S. Golwalkar यांच्या ‘बंच ऑफ थॉट’वर आधारित […]

अधिक वाचा..

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “उडता पंजाबप्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकार करत असून, राज्यातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही,” असा इशारा दिला. मुंबईतील टिळक भवन येथे माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. त्यांनी […]

अधिक वाचा..

महाडात समतेचा जलक्रांती संदेश; चवदार तळे शताब्दी वर्षाचा भव्य शुभारंभ.

मुंबई: महाड चवदार तळे सत्याग्रह च्या शताब्दी वर्षानिमित्त महाडमध्ये भव्य कार्यक्रमाने शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत विविध मान्यवरांनी प्रभावी भाषणे केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी हे “समतेचे अमृत” असल्याचे सांगत, हे पाणी गावोगावी नेऊन तलाव, नद्या आणि धरणांमध्ये सोडून समतेचा संदेश […]

अधिक वाचा..

अमेरिका–इस्त्राईल–इराण युद्ध थांबून शांतता प्रस्थापित व्हावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: हर्षवर्धन सपकाळ यांनी अमेरिका, इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत हे युद्ध लवकर संपून आशियात शांतता निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष सपकाळ यांनी मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाला भेट देऊन सईद रझा मोसायब मोतलाघ यांच्याशी चर्चा केली. या भेटीत […]

अधिक वाचा..

एलपीजी दरवाढ तात्काळ रद्द करा; गॅस धोरणावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावे; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: एलपीजी गॅसच्या दरात ६० रुपयांची वाढ करून केंद्रातील भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करण्याऐवजी ही दरवाढ तात्काळ रद्द करावी, तसेच एलपीजी गॅस संदर्भातील स्पष्ट धोरण पंतप्रधानांनी संसदेत जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. गॅस दरवाढ व गॅस […]

अधिक वाचा..

गॅस तुटवड्यासाठी भाजपा सरकार जबाबदार; दांडी मार्चच्या प्रेरणेने आंदोलन करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असला तरी त्यामागे भाजपा सरकारची चुकीची धोरणे आणि नाकर्तेपणा कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दांडी मार्चची प्रेरणा घेऊन जनतेने आंदोलन करावे आणि सरकारला धारेवर धरावे, असे आवाहन त्यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ […]

अधिक वाचा..

संदीप शेळके शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये; सपकाळ यांचा फडणवीसांना ‘गेट वेल सून’ टोला

मुंबई: बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी सपकाळ यांनी शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला अखिल […]

अधिक वाचा..