‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “उडता पंजाबप्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकार करत असून, राज्यातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही,” असा इशारा दिला. मुंबईतील टिळक भवन येथे माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. त्यांनी […]

अधिक वाचा..

महाडात समतेचा जलक्रांती संदेश; चवदार तळे शताब्दी वर्षाचा भव्य शुभारंभ.

मुंबई: महाड चवदार तळे सत्याग्रह च्या शताब्दी वर्षानिमित्त महाडमध्ये भव्य कार्यक्रमाने शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देत विविध मान्यवरांनी प्रभावी भाषणे केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी हे “समतेचे अमृत” असल्याचे सांगत, हे पाणी गावोगावी नेऊन तलाव, नद्या आणि धरणांमध्ये सोडून समतेचा संदेश […]

अधिक वाचा..

अमेरिका–इस्त्राईल–इराण युद्ध थांबून शांतता प्रस्थापित व्हावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: हर्षवर्धन सपकाळ यांनी अमेरिका, इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत हे युद्ध लवकर संपून आशियात शांतता निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष सपकाळ यांनी मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाला भेट देऊन सईद रझा मोसायब मोतलाघ यांच्याशी चर्चा केली. या भेटीत […]

अधिक वाचा..

एलपीजी दरवाढ तात्काळ रद्द करा; गॅस धोरणावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करावे; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: एलपीजी गॅसच्या दरात ६० रुपयांची वाढ करून केंद्रातील भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करण्याऐवजी ही दरवाढ तात्काळ रद्द करावी, तसेच एलपीजी गॅस संदर्भातील स्पष्ट धोरण पंतप्रधानांनी संसदेत जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. गॅस दरवाढ व गॅस […]

अधिक वाचा..

गॅस तुटवड्यासाठी भाजपा सरकार जबाबदार; दांडी मार्चच्या प्रेरणेने आंदोलन करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असला तरी त्यामागे भाजपा सरकारची चुकीची धोरणे आणि नाकर्तेपणा कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दांडी मार्चची प्रेरणा घेऊन जनतेने आंदोलन करावे आणि सरकारला धारेवर धरावे, असे आवाहन त्यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ […]

अधिक वाचा..

संदीप शेळके शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये; सपकाळ यांचा फडणवीसांना ‘गेट वेल सून’ टोला

मुंबई: बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी सपकाळ यांनी शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला अखिल […]

अधिक वाचा..

शक्तीपीठ महामार्ग लाडक्या उद्योगपतींसाठी रेडकार्पेट

मुंबई: अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असून नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले असून त्यांनी देश विकायला काढला आहे, अशी घणाघाती टीका करत मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी, सरकारला जागे करण्यासाठी, तसेच […]

अधिक वाचा..

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा लढवावी लागणार आहे. या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे. गांधी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा भाजपावर जोरदार हल्ला; देश दोन विचारधारांच्या उंबरठ्यावर; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात सध्या दोन विचारधारांची स्पष्ट लढाई सुरू असून एक विचारधारा काँग्रेसची तर दुसरी भाजपाची आहे. संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशक भारत घडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर देश फक्त मुठभर लोकांच्या हाती असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा आणि मनुवादी विचारांना मानणारा भारत घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. चिपळूण […]

अधिक वाचा..

काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय, २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: काँग्रेस पक्ष देशात व राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. काँग्रेस हाच भाजपला पर्याय आहे. आगामी काळात काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढेल, त्यासाठी जोमाने काम करा. २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या कोकण विभागातील लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय निवासी […]

अधिक वाचा..