डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहून सपकाळ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गांधी स्मारक निधीचे […]

अधिक वाचा..

भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका मुंबई: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सपकाळ म्हणाले की, नरेंद्र […]

अधिक वाचा..

राम मंदिर देणगीप्रकरणी RSS ने संबंधितांना संघातून काढावे; हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान

मराठवाडा आढावा बैठकीत सरकारवरही जोरदार टीका; “दुबार पेरणी, दुष्काळ आणि बोगस बियाण्यांप्रमाणे बोगस सरकार” असा हल्लाबोल छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अयोध्या राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला. राम मंदिरावरील देणगीप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करत त्यांना संघातून निष्कासित करण्याची हिंमत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवावी, […]

अधिक वाचा..

MPSC भरती प्रक्रियेत व्यापमपेक्षा मोठा घोटाळा; ऑनलाइन परीक्षा रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रियेत मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. MPSC ची ऑनलाइन (CBT) परीक्षा पद्धत आणि Normalization तातडीने रद्द करून पारदर्शक ऑफलाइन परीक्षा घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. बेलापूर येथे MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसतर्फे सुरू […]

अधिक वाचा..

महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले; सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून समृद्धी महामार्गासह राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. समृद्धी महामार्गात २० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हा पैसा राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापरल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकराव चौधरी यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर जळगाव येथे […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत एल्गार थांबणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ 

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित ‘एल्गार अन्नदात्याचा’ आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारने फसवी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, सातबारा कोरा होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

ओबीसी विचार देशभर पोहोचवण्याची गरज; राहुल गांधींच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ द्या; हर्षवर्धन सपकाळ

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त टिळक भवनात ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार मुंबई: महाराष्ट्राने देशाला ओबीसी विचार दिला असून, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा समतावादी विचार आणि वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे ओबीसी चळवळीचे मूलभूत आधार आहेत. जातीपलीकडे जाऊन माणसाला केंद्रस्थानी ठेवणारा महाराष्ट्राचा हा विचार आता देशभर पोहोचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

TET पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…

मुंबई: महाराष्ट्रात रविवारी (२८ जून) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या वृत्तांवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सपकाळ म्हणाले की, भाजपा सरकारला कोणतीही परीक्षा पेपरफुटीशिवाय पार […]

अधिक वाचा..

संविधान रक्षणासाठी संघर्षाची तयारी ठेवा; अनुसूचित जातींची भूमिका महत्त्वाची; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात असून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त चेअरमन अनिरुद्ध वनकर यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, […]

अधिक वाचा..

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा अधिकार असून, राज्य सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील काही तरतुदी या मूळ कायद्याशी विसंगत आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या तरतुदी तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..