आरोग्य योजनांचा लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: ‘आयुष्यमान भारत’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने’चा लाभ गरजू रुग्णांना नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांचा मनमानी कारभार सुरू आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णांना आरोग्य योजनांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या काळात सभागृहात मांडला. ते म्हणाले, चंद्रपूर […]

अधिक वाचा..

मोफत उपचारांना ब्रेक! शासकीय रुग्णालयांत पुन्हा शुल्क; केसपेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत दर लागू

मुंबई: अडीच वर्षांपूर्वी राज्यात सुरू करण्यात आलेल्या ‘पूर्ण मोफत उपचार’ धोरणाला आरोग्य विभागाने अखेर यू-टर्न घेतला आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आता पुन्हा उपचारांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून जिल्हा व महिला रुग्णालयांपर्यंत नवे दर लागू होणार आहेत. बाह्यरुग्ण विभागातील केसपेपरसाठी ५ रुपये, तर सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी तब्बल ४० हजार रुपये मोजावे […]

अधिक वाचा..

आता सर्व सरकारी रुग्णालयात विविध चाचण्या मोफत होणार

बरोबरच केसपेपर सुद्धा निःशुल्क मिळणार संभाजीनगर: सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता राज्यातील आरोग्य केंद्रापासून ते सरकारी रुग्णालयात अगदी केसपेपर काढण्यापासून ते विविध चाचण्या निःशुल्क केल्या जाणार आहेत. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला असून लवकरच […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांचे फायर ऑडिट करणार; उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई: मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयांचे लवकरच फायर ऑडिट करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने धोका निर्माण झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री सुनील राऊत, अमित देशमुख, सुनील प्रभू, अमिन पटेल, आशिष शेलार, राम कदम, राजेश टोपे, अजय चौधरी, रवी राणा यांनी उपस्थित केला होता. मंत्री […]

अधिक वाचा..

रुग्णालयात रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा; अजित पवार 

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जावू नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तात्काळ थांबवावेत, अशी मागणी विधानसभेचे […]

अधिक वाचा..