लग्नानंतर होईलच प्रेम! लालबागच्या राजाच्या साक्षीने जीवा-नंदिनी, पार्थ-काव्याची दणक्यात वरात!

मुंबई: स्टार प्रवाहवरील सुपरहिट मालिका लग्नानंतर होईलच प्रेम सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या या दोन्ही जोडप्यांनी प्रेम जुळल्यानंतर पुन्हा एकदा स्वखुशीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.या खास प्रसंगानिमित्त दोन्ही जोडप्यांची वरात थेट मुंबईच्या रस्त्यांवरून दणक्यात निघाली. लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेत या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात रंगली वरात […]

अधिक वाचा..

मुंबईचा किंग कोण! महाराष्ट्रातील २९ महापालिकांचा निकाल आज

बीएमसीकडे राज्याचे लक्ष मुंबई: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्यभरात एकूण ८९३ जागांसाठी २,८०० हून अधिक नगरसेवकांचे भवितव्य आज मतमोजणीत ठरणार आहे. मात्र, सर्वांच्या नजरा मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निकालावर केंद्रित झाल्या आहेत. मुंबईतील २२७ वॉर्डांसाठी २३ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. अनेक दशकांपासून शिवसेनेचे बीएमसीवर वर्चस्व राहिले […]

अधिक वाचा..

मी संस्थानिकांचा, राजा महाराजांचा मुलगा नाही; जयकुमार गोरे

सातारा: प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो. मी माझा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय तसाच ते देखील करत आहेत. मात्र, कोणी असुरक्षित वाटून घेण्याचे कारण नाही. कोण किती मतांनी निवडून आले आहे ते निवडणूक आयोग व तुम्हालाही माहीत आहे. मी संस्थानिकांचा मुलगा नाही, मी राजा महाराजांच्या कुटुंबातून आलेलो नाही, सामान्य शेतकर्‍याचा पोरगा म्हणून मी […]

अधिक वाचा..

दहशत माजवणाऱ्या किंग ऑफ शिक्रापूरला पोलिसांकडून ठोकल्या बेड्या…

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) येथे हातामध्ये कोयता घेऊन मी किंग ऑफ शिक्रापूर आहे असे म्हणून कोयता फिरवून दहशत माजवणाऱ्या किंग ऑफ शिक्रापूरला शिक्रापूर पोलिसांनी गुन्हे दाखल करत बेड्या ठोकल्या असून सुरज विष्णू शितोळे असे पोलिसांनी गुन्हे दाखल करत अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. पिंपळे धुमाळ (ता. शिरुर) येथे एक युवक हातामध्ये कोयता […]

अधिक वाचा..

प्रजा कोण आणि राजा कोण याचे उत्तर जनतेने विधान परिषद निवडणुकीतून दिले…

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जनतेने धुळ चारली असून महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला आहे. नागपूर, अमरावतीमध्ये काँग्रेसने भाजपा उमेदवारांचा दणदणीत पराभव केला आहे तसेच औरंगाबादमध्ये मविआ उमेदवाराने विजय संपादन केला आहे. खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही या निवडणुकीत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. या निकालाने ‘प्रजा कोण आणि राजा […]

अधिक वाचा..