विधी मंडळाच्या विविध समितीचे कामकाज पारदर्श पद्धतीने झाले पाहिजे, यात काम करणाऱ्या सगळ्यांचे स्क्रिनिंग करावे

हुंडाबळी प्रकरणातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर कडक कारवाई व्हावी नागपूर: महाराष्ट्राच्या विधी मंडळ समितीचा अभ्यास दौरा धुळे इथे होत असताना पैसे सापडले ही घटना गंभीर आहे. याने विविध समित्यांच्या कामकाज बाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. या समितीच्या कामकाज शुभारंभाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरी असे प्रकार घडत असतील तर या समिती संदर्भात सगळ्यांचे स्क्रिनिंग झाले […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांच्या एकत्रित उद्घाटन कार्यक्रम सोहळा १४ मे रोजी विधान भवनात होणार 

मुंबई: महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या समित्यांचे एकत्रित उद्घाटन कार्यक्रम १४ मे बुधवार २०२५ रोजी. सकाळी११.३० वाजता विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला आहे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या समित्या.२३ एप्रिल२०२५. रोजी. समित्या शासनाने जाहीर केल्या होत्या या सर्व समित्यांचे एकत्रित उद्घाटनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक१४ मे २०२५ रोजी. सकाळी […]

अधिक वाचा..

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्या दिल्लीत विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

राज्यसभेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपराष्ट्रपतींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यासपीठावर उपस्थित होते. लोकसभेच्या […]

अधिक वाचा..

आता तर मनसेला महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधीत्व देखील नाही

मुंबई: विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसेवर पक्षचिन्ह रेल्वे इंजिन जाते की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल… आपल्या पक्षात कार्यकर्ते… पदाधिकारी कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका स्वीकारेल का यावर आत्मचिंतन करावे असा […]

अधिक वाचा..

विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई: विधान भवन, मुंबई येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६व्या दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ. […]

अधिक वाचा..

मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून आज विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

विधानपरिषदेचे ६ विद्यमान सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी

मुंबई: नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत विधानपरिषदेचे विद्यमान ६ सदस्य विजयी झाले आहेत. मुंबईचा एकाचवेळी दोन सदनांचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९५७ च्या अनुच्छेद ३ नुसार या नवनिर्वाचित ६ विधानसभा सदस्यांना विधानपरिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिध्द होताच आपोआप त्यांचे अगोदरचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द होते. १) आमश्या […]

अधिक वाचा..

लोकसभा, विधानसभेची प्रत्येक जागा जिंकण्याच्या उद्देशाने काम करा; नाना पटोले

मुंबई: लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुका होतील. या दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष आतापासूनच तयारीला लागला आहे. लोकसभेच्या ४८ जागा व विधानसभेच्या सर्व मतदारसंघात काँग्रेसचे संघटन, सेल, विभाग, फ्रंटल ऑर्गनाझेशन, या सर्व घटकांनी पूर्ण ताकदीने काम करावे. प्रत्येक जागा जिंकण्याचा निर्धार करूनच कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा; नाना पटोले

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज हे केवळ अधिवेशनापरुतेच चालत नसते तर ते वर्षभर चालत असते. विधिमंडळ कामकाजासाठी कमिट्या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु २०१९ नंतर आतापर्यंत या कमिट्यांचे गठन करण्यात आलेले नाही आणि वर्षभराच्या आत तर पुन्हा निवडणुका लागणार आहेत. नवीन आमदारांसाठी या कमिट्या महत्वाच्या आहेत, या कमिट्या गठीत करण्याचे निर्देश देऊन अधिवेशन संपताच तात्काळ त्याची अंमलबजावणी व्हावी,अशी […]

अधिक वाचा..

पहिल्याच दिवशी विधान परिषद सभागृहात  सुरूवातीलाच विरोधी पक्ष सदस्यांचा गोधळ…

मुंबई: मनिषा कायदे, विपल्प बाजोरिया तसेच डाॅ. नीलम गो-हे यांच्या विरोधात पक्ष बदलल्याने अपात्र करण्याची कारवाई करावी या मागणीचे पत्र विधान परिषद विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटाचे दिले. याबाबत सभागृहात विरोधी पक्षाने पॉइंट ऑफ ऑर्डरद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर आक्षेप घेता येणार नाही, असे सांगितले. मात्र यावर विरोधी पक्षाचे सदस्यांनी गोधळ […]

अधिक वाचा..