शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! कांद्याचे दर दुप्पट होण्याची शक्यता…

शिरूर: बाजारत टोमॅटोचे दर हे 150 ते 200 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले असून, आता कांद्याच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कांद्याच्या दरात वाढ झाल्यास कांदा उत्पादकांना चांगला फायदा होणार आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे; कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई: शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते […]

अधिक वाचा..

पदयात्रा व बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार; नाना पटोले

मुंबई: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती […]

अधिक वाचा..

कुठे चाललाय आमचा महाराष्ट्र 

मुंबई: सरकारच डोक ठिकाणावर आहे का? अस ठणकावून विचारणारे जहाल स्वातंत्र्य सेनानी ‘केसरी ‘चे संपादक, सार्वजनिक गणपति, नवरात्र उत्सवांच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी जागृती करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी १ ऑगस्ट ला साजरी केली. गरिबांच्या हक्कासाठी आवाज बुलंद करणारे, आपल्या प्रतिसरकारच्या माध्यमातून इंग्रजांनाही सळो की पळो करून सोडणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती  ३ ऑगस्टला […]

अधिक वाचा..

संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का?

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडेने अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरून अकलेचे तारे तोडले आहेत. संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करत असतो पण भाजपा सरकार त्याविरोधात कारवाई करत नाही. भाजपाला संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना […]

अधिक वाचा..
rahata-marriage

महाराष्ट्रभर चर्चा! अहमदनगर जिल्ह्यात लागले स्मशान भुमित लग्न…

अहमदनगर: स्मशानभूमी म्हंटले की जळणारी चिता, नातेवाईकांचा आक्रोश आणि निरव शांतता असे चित्र असते. पण, राहाता शहरातील स्मशानभूमीत विवाह सोहळा पार पडला. सनई चौघड्यांचे स्वर, मांडव व गुरुजींच्या आवाजात मंगलाअष्टक असे अनोख चित्र दिसून आले. या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. राहाता शहरातील गंगाधर गायकवाड दाम्पत्य अनेक वर्षांपासून स्मशानभूमीत राहत मसनजोगी करत आपला उदरनिर्वाह […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार; अंबादास दानवे

मुंबई: खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात केला. सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यमंत्री […]

अधिक वाचा..

… तर किरीट सोमय्या महाराष्ट्रद्रोहीच, थांबवा हा राजकीय नंगेपना हा असा असतो का स्त्रीसन्मान?

मुंबई: स्त्रीसन्मानाच्या गोष्टी करणारे देशाचे पंतप्रधान किती स्त्रीसन्मान राखतात हे दिल्लीतील कुस्तीगीर खेळाडूंच्या दोन महिने चाललेल्या आंदोलनातून दिसून आले. महिलांनी तक्रार केल्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने त्या महिलांना आंदोलन करावे लागेल आणि त्यांची फरपट कशाप्रकारे झाली हेही जगाने पाहिले आणि आता तर स्वतःला भ्रष्टाचारांचा कर्दनकाळ म्हणणारे “हातोडा सम्राट” माजी खासदार कीरिट सोमय्या यांच्यां कथित […]

अधिक वाचा..

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानच्या महाराष्ट्र राज्य “प्रसिद्धीप्रमुख” पदी जिजाबाई दुर्गे

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): महाराष्ट्र सरकार मान्यताप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेली ISO मानांकन असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रसिद्धीप्रमुखपदी जिजाबाई दुर्गे, राज्य महिला सहसचिवपदी सुजाता रासकर आणि राज्य महिला महासचिवपदी बेबी पिंपरकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षपदी डॉ सुनीता पोटे यांची निवड करण्यात आली. माळशेज घाट […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे क्रांतिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जागे व्हा…

मुंबई: माध्यमकर्मीसाठी  बदललेल्या काळ आणि परिस्थितीनुसार पत्रकार धोरण, पत्रकार सर्वसुरक्षा आणि सर्वसामावेशक हितासाठी लोकशाहीच्या इतर तिन्ही स्तंभाप्रमाणे त्यांच्या सन्मानासाठी निवृत्तीनंतर आणि काम करतानाही हितकारक कृती होण्याची गरज होती व आहे. मात्र आपल्या राज्यातील एकूणच स्वार्थी अराजकी पाहता कोणत्याही राजकारण्याला अथवा आपणास पत्रकारांसाठी सर्वसामावेशक अशी ठोस भूमिका घेण्याची गरज वाटत नाही असे दिसून येते. जर राज्यकर्तेच […]

अधिक वाचा..