गुजरातला उद्योग हलवून महाराष्ट्रात रोजगार कसा देणार

मुंबई: मोदी सरकारने महाराष्ट्रातील इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, मरीन अकादमी, बल्क ड्रग पार्क, डायमंड बोर्सपासून, फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रचंड रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्राकडून हिरावून गुजरातला नेले असता महायुतीने आपल्या जाहिरनाम्यात 25 लाख रोजगार देण्याचे आश्वासन कसे दिले आहे, असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते, माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केला आहे. महाराष्ट्राचा राज्य उत्पन्नाचा वाटा दोन […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे सरकार शेतकरीविरोधी भाजपला पराभूत करून राज्यात बळीराजाचे राज्य आणा; नाना पटोले

मुंबई: भाजपा सरकारच्या राज्यात शेतकरी रोज मरत आहे पण भाजपा शिंदे सरकारला त्याची चिंता नसून त्यांना फक्त खुर्चीची चिंता आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकरी हिताचे निर्णय घेऊ. धानाला २३०० रुपये हमीभाव आहे, मविआचे सरकार आल्यानंतर धानाला १ हजार रुपयांचा बोगस देऊ. भाजपा शिंदे सरकार शेतकरी विरोधी असल्याने भाजपाच्या हाती सत्ता देऊ नका, बळीराजाचे राज्य […]

अधिक वाचा..

संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करु

नंदूरबार: संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधाना रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, गांधीजी, महात्मा फुले, डॉ. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचार सभांमधून महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधींनी पुनर्जन्म घेतला तरी जम्मू काश्मीरमधील ३७० कलम पुन्हा लागू करु शकत नाहीत अशी दर्पोक्ती करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत ३७० कलमाचा काय संबंध? महागाई, बेरोजागारी प्रचंड वाढली आहे, महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, त्याच्या सोयाबीन, […]

अधिक वाचा..

गुजरातसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या पक्षाला निवडून द्या…

मुंबई: महाभ्रष्ट महायुती भाजपा सरकारच्या काळात गुजरातच्या ठेकेदारांना मोठी कामे दिली तर टाटा एअरबस, वेदांता फॉक्सकॉन हिरे उद्योग, बल्क ड्रग्ज पार्क सारखे महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला पाठवून येथील रोजगारही पळवले. महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगार गुजरातला दिले आणि गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज महाराष्ट्रात आणून तरुणपिढी बरबाद करण्याचे पाप भाजपा युती सरकारने केले आहे. शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार भाजपा युतीला घरचा रस्ता दाखवा अन्यथा…

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यापासून मागील १० वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नव्हता तर वस्तुस्थिती आहे यावर केंद्रातील भाजपा सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच हा अहवाल दिला असून राज्यातील शिंदे भाजपाचे गुजरात धार्जिणे सरकार व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिके मुळेच महाराष्ट्राची अधोगती झाल्याचा घणाघाती हल्लाबोल […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र काँग्रेसने ‘आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी जाहिरात प्रसिद्ध

मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसने ‘आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी जाहिरात प्रसिद्ध केली, यात महागाई व बेरोजगारी दूर करण्यातील महायुतीचे अपयश उघड केले आहे. आज महाराष्ट्र काँग्रेसने ‘ आता चालणार नाही’ मोहिमेतील दुसरी महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत सरकारवर आवश्यक वस्तूंच्या दरवाढीवर थेट प्रहार करण्यात आला आहे. पेट्रोल-डिझेलपासून गहू-तांदुळासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे महाराष्ट्रातील सामान्य […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र शासन अंगणवाडी मुख्य सेविका भरतीला सुरुवात; त्वरित अर्ज करा….

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे अंगणवाडी मुख्य सेविका या पदांची सरळ सेवा भरतीसाठी एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2024 आहे. या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना परमनंट नोकरीची संधी उपलब्ध होणार […]

अधिक वाचा..

शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्याच्या प्रयत्नांबद्दल स्पेनच्या पंतप्रधानांकडून महाराष्ट्राची प्रशंसा

मुंबई:- महाराष्ट्र शासनाकडून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ (Pedro Sanchez) यांनी प्रशंसा केली आहे. विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्याशी काल (दि २९) येथील राजभवनमध्ये चर्चा करतांना श्री सांचेझ यांनी डॉ गोऱ्हे यांच्याकडून महाराष्ट्र शासनाकडून शाश्वत विकासासाठी जिल्हा स्तरावर कोणकोणत्या प्रकल्पांना उत्तेजन दिले जाते, याबद्दलही माहिती घेतली. […]

अधिक वाचा..

भाजपा सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय

मविआचे सरकार आल्यावर मोदी-शाहांची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही मुंबई: भाजपा सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी शाह यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर […]

अधिक वाचा..