Leader

आरक्षणातील गोंधळामुळे जिल्हा परिषदांवर अनिश्चितता कायम…

शिरुर (तेजस फडके) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महापालिका तसेच जिल्हा परिषदांच्या आरक्षणात ५० टक्क्यांच्या मर्यादेचे पालन न झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होत आहे. राज्यातील २७ पैकी दोन महापालिका चंद्रपूर आणि नागपूर तसेच ३२ पैकी १७ जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा यांचे अमरावती येथे निधन

अमरावती: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ,हास्यसम्राट, ‘मिर्झा एक्सप्रेस ‘फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज २८ नोव्हेंबर शुक्रवारला सकाळी ६.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.ते ६८ वर्षांचे होते. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज -माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘ मिर्झा एक्सप्रेस ‘ या घरात त्यांचे वास्तव्य होते.त्यांच्या […]

अधिक वाचा..

राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव

मुंबई: सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे येत्या 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून राजेश अग्रवाल त्यांच्याकडून 30 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील. राजेश अग्रवाल यांचा अल्प परिचय राजेश अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे 1989 चे […]

अधिक वाचा..
SARPANCH

नगरपरिषद, नगरपंचायत, ZP नंतर सरपंच निवडणूक; देता येणार २ मते…

मुंबईः नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेनंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडतील. नव्या निर्णयानुसार या ग्रामपंचायतींचा कारभारी तथा सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे सदस्यांपेक्षा सरपंचपदासाठीच अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता साडेतीन वर्षांपासून प्रशासक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी संपविल्या जाणार आहेत. दरम्यान, […]

अधिक वाचा..

भारत आणि महाराष्ट्रातील लोकशाही मूल्ये जागतिक स्तरावर प्रेरणादायी

बार्बाडोस येथील 68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेतून भाष्य बार्बाडोस: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या बार्बाडोस येथे सुरू असलेल्या 68व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (CPA) च्या जागतिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. या परिषदेत जगभरातील २८ देशांतील प्रतिनिधी आणि भारतातील सुमारे ३५ पीठासीन अधिकारी सहभागी झाले आहेत. उद्घाटन सत्रात “Parliaments since Beijing +30: Progress, […]

अधिक वाचा..

नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे, फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे

नाशिक: मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका दमडीचीही घोषणा केली नाही. […]

अधिक वाचा..

पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत तर त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांसाठी अपूर्ण राहिलेल्या कामाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होत आहे,वडेट्टीवार यांची टीका नागपूर: देशाचे पंतप्रधान हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नवी मुंबई विमानतळ, मेट्रो प्रकल्प असे विविध प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन सोहळे पार पाडले जात आहेत. पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असताना शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची […]

अधिक वाचा..

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत

नागपूर: महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. सरकारने फक्त कोरडया घोषणा केल्या. रविवारी केंद्रीय. गृहमंत्री तथा सहकार मंत्री महाराष्ट्रात एका कार्यक्रमाला आले पण शेतक-यांच्या संकाटावर व मदतीवर एक शब्द बोलले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर हतबल झाले. राज्यातील संकटात […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर; हर्षवर्धन सपकाळ मुंबई: महाराष्ट्रावर प्रचंड मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे, ५० लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे, १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जनावरे दगावली आहेत. राज्यात अत्यंत विदारक चित्र असताना महायुती सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

अधिक वाचा..

कवलापूर येथे विमानतळाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून तात्काळ सर्वेक्षण करा

मुंबई: सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ उभारणीबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षण हाती घ्यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे कार्गो विमानतळ व नागरी विमानतळ संदर्भात बैठक […]

अधिक वाचा..