मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका:! भाजपाचे यश खरंच किती प्रामाणिक?

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकांनंतर, जवळपास सर्वच न्यूज चॅनेल्स व वर्तमानपत्रांतून “भाजपाची मुसंडी”, “दणदणीत यश”, “२६ महापौर भाजप-युतीचे” अशा मथळ्यांनी वार्तांकन करण्यात आले. मात्र, या वार्तांकनामध्ये खरी परिस्थिती आणि मूलभूत प्रश्नांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

भाजपाचे यश: विकासाचे की पक्षांतराचे

भाजपाच्या या यशामागील कारणे काय आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. हे यश खऱ्या अर्थाने नवीन कार्यकर्त्यांच्या कामामुळे आहे की जवळपास प्रत्येक महानगरपालिकेत इतर पक्षांतील माजी आमदार, खासदार, नगरसेवक मोठ्या प्रमाणावर पक्षात घेऊन मिळवले गेले आहे?

मुंबई महानगरपालिकेतील वास्तव

मुंबई महानगरपालिकेत भाजपाची जागा आधी ८३ होती. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गट, काँग्रेस इतर पक्षांतील माजी नगरसेवक तसेच शिंदे गटाची मदत असूनही भाजप फक्त ८९ जागांवर पोहोचले, म्हणजेच केवळ ६–७ जागांची वाढ झाली. तरीही हा निकाल “जनतेचा प्रचंड कौल” म्हणून मांडला जात आहे.

यातून उठणारे प्रश्न

किती नवीन भाजप कार्यकर्ते नगरसेवक झाले?

किती इतर पक्षातून आलेले उमेदवार निवडून आले?

सरकारी यंत्रणांचा दबाव, चौकशीची भीती, सत्तेचा गैरवापर यावर चर्चा का होत नाही?

पत्रकारितेची जबाबदारी

लोकशाहीत पत्रकारिता ही चौथा स्तंभ आहे. सत्तेची बाजू मांडणे नव्हे, तर सत्तेला कठोर, थेट आणि निर्भीड प्रश्न विचारणे हेच तिचे खरे कर्तव्य आहे.

नम्र पण ठाम आवाहन

तमाम पत्रकार बंधूंना आणि संपादकांना विनंती आहे की आकड्यांच्या पलीकडचं सत्य जनतेसमोर आणावे, “विकास” आणि “पक्षांतर” यातील फरक स्पष्ट करावा. सत्य दाखवणारा आरसा लोकशाही जिवंत ठेवतो, आणि मीडिया प्रतिष्ठा टिकवण्यासाठी हाच मार्ग आहे.