महाराष्ट्रात मराठी अस्मितेबरोबरच, मुंबईत सर्व प्रांतातील लोक आनंदाने राहतात; रमेश चेन्नीथला

राज ठाकरे यांच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत दक्षिण व उत्तर भारतीयांबरोबच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आनंदाने राहतात. कोणताही भाषिक वा प्रांतीय वादाचा प्रश्न नाही परंतु महाराष्ट्रात आम्ही मराठी लोकांच्या भावना व त्यांच्या अस्मितेबरोबर आहेत, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी म्हटले आहे. मराठी हिंदी वाद व […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रावर हिंदी थोपवण्याच्या विरोधात, मराठीच्या अस्मितेसाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील 

मुंबई: मराठी ही केवळ एक भाषा नाही; ती महाराष्ट्राच्या अस्मितेची, संस्कृतीची, इतिहासाची आणि लोकजीवनाच्या अभिव्यक्तीचा आत्मा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुलेंपर्यंत, लोकशाहीच्या चळवळींपासून सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनांपर्यंत, प्रत्येक टप्प्यावर मराठी भाषेनेच या भूमीच्या विचारांना आकार दिला आहे. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्रात मराठी भाषेवरच अन्याय सुरू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून हिंदी जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशावर […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा RSS व भाजपाचा कुटील डाव हाणून पाडू, मराठीचा गळा घोटू देणार नाही

भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी मुंबई: महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचा शासन आदेश जारी झाल्यापासून हा निर्णय रद्द करावा ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. ८ व्या सुचीतील सर्वभाषा संपवून केवळ हिंदी एकच भाषा ठेवायची हा संघ व भाजपाचा कुटील डाव आहे. हा कुटील डाव […]

अधिक वाचा..

हिंदी भाषा सक्तीच्या या एकांगी निर्णयाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा विरोध

पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेचा आग्रह करणे अन्यायकारक रत्नागिरी: राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदी विषयाची सक्ती नसावी, अशी भूमिका निर्माण झाली आहे. राजकारण्यांबरोबरच साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने सुद्धा आता काही महत्त्वाची कारणे देत हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध दर्शवला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या […]

अधिक वाचा..

हिंदी भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक

मराठी भाषेसाठी महायुती सरकारने घेतले अनेक ऐतिहासिक निर्णय मुंबई: राज्याच्या नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीबाबत केली जाणारी सर्व आंदोलने गैरसमजातून केली जात असून ती निरर्थक आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी आज केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत […]

अधिक वाचा..

हिंदीची सक्ती करून मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती नष्ट करण्याचा डाव, हिंदी भाषेची सक्ती रद्द करा

मुंबई: मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. विविधेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावरील सामाजिक संदेश मराठी भाषेत प्रदर्शित करावे

मुंबई: येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यवसायिक वाहनावर लिहिले गेलेले सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘मराठी भाषा दिवस’ साजरा होणार

डॉ. राम सुतार, मधु मंगेश कर्णिक, अशोक सराफ, दिलीप वेंगसरकर, सयाजी शिंदे, वैशाली सामंत, इंद्रनील चितळे यांचा होणार सन्मान… मुंबई: मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला; मंत्री उदय सामंत

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे. त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले. रा.रं.बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर, 1940 रोजी […]

अधिक वाचा..

मराठी साहित्य, अजरामर करणारे वरदान 

उमेद, धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा, सोशल मीडिया कायद्याच्या चौकटीत असायला हवे मुंबई: मराठी साहित्य भाषा अजरामर करणारे वरदान आहे.मुलामुलींची उमेद,धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचायला द्या,वाचन संस्कृती वाढवा” असे आवाहन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले . उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई […]

अधिक वाचा..