गुजरातीबहुल मतदारसंघातील मराठी चेहरा; रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने तावडे यांची निवड निश्चित झाली. तब्बल २५ वर्षांनंतर शिवसेनेच्या ताब्यातील महापौरपद भाजपकडे गेले आहे. घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रितू तावडे या गुजरातीबहुल मतदारसंघातून […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा; नाना पटोले

मुंबई: केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिकांच्या भावना गौरवण्यात आल्या आहेत. हा निर्णय मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा सन्मान आहे. विमानात सध्या हिंदी व इंग्रजी भाषेत उद्घोषणा केली जाते, यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वच विमानातून मराठीची उद्घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

मराठी वाचकांना भुरळ पाडणारे कादंबरीकार भैरप्पा यांच्या निधनाने साहित्याचे एक पर्व संपले;

मुंबई: देशातील ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि प्रख्यात कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांच्या जाण्याने देशातल्या साहित्य विश्वातले पर्व संपले अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भैरप्पा यांच्या अनेक कादंबऱ्यांचा मराठीमध्ये देखील अनुवाद झाला असून या कादंबऱ्यांनी मराठी म्हणाला अक्षरशः भुरळ पाडली असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणतात की, भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांनी वाचकांना एका वेगळ्या […]

अधिक वाचा..

मराठी माणसाचा अपमान; पण महाराष्ट्रातील ४५ खासदार गप्प का

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. त्यावेळी निशिकांत दुबे यांना जय महाराष्ट्र बोलत तिथून काढता […]

अधिक वाचा..

राजश्री मोरे यांनी मनसेला पुन्हा डिवचल; मराठी बोलून प्रगती होत नाही

मुंबई: मराठी विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नखशिल्पकार (नेल आर्टिस्ट) राजश्री मोरेने पुन्हा एकदा मनसेला डिवचले आहे. मराठी बोलून प्रगती होत नाही आम्हाला चांगल्या रस्त्यांची गरज आहे, असे तिने एका चित्रफितीत म्हटले आहे. राज ठाकरे यांनी खासदार दुबे यांना दिलेल्या धमकीचीही तिने हसून खिल्ली उडवली आहे. त्यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राजश्री मोरे (३९) ही […]

अधिक वाचा..

माझ्याशी हिंदीत नाही तर मराठीतच बोला; आयएएस अधिकाऱ्यांना सरनाईकांनी ठणकावले

मुंबई: माझ्याशी बोलताना हिंदीत नाही तर मराठीतच बोला, असे भर कार्यक्रमातच परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आयएएस अधिकाऱ्यांना बजावले. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मैनिक घोष हे हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे या दोघांना यापुढे हिंदीत बोलणार असाल तर मी बोलणार नाही. महाराष्ट्र केडर घेऊन जर नोकरी करीत […]

अधिक वाचा..

वर्षा देशपांडे यांच संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण

मुंबई: महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी वादावरून चांगलेच रान पेटले आहे. त्यातच एका मराठमोळ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मूळच्या वर्धा येथील आणि सध्या साताऱ्यात वास्तव्य असणाऱ्या डॉ. वर्षा देशपांडे यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर येथे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन पुरस्काराने गौरवण्यात आले. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार; हर्षवर्धन सपकाळ

मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसची “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” मराठी भाषा कार्यशाळा मुंबई: मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही मारहाण करणार नाही तर मराठी […]

अधिक वाचा..

हिंदी मराठी वाद निर्माण करून वाढवलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार

मीरा भाईंदरमध्ये उद्या मंगळवारी “आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा” संवाद संगोष्ठी मुंबई: मराठी आणि हिंदी भाषिक वर्गामध्ये मिरा भाईंदर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये तणाव वाढवणाऱ्या घटना घडलेला आहेत. भाषेवरून द्वेष व वितुष्ट निर्माण करण्यामागे काही शक्ती कार्यरत आहेत. यातून कोणाला राजकीय फायदा होत आहे हे सर्वांना माहित आहे. परंतु असा तणाव निर्माण होणे समाजाच्या हिताचे […]

अधिक वाचा..

मंगळवारी मीरा रोड येथे काँग्रेसची आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा कार्यशाळा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम मुंबई: मिरा भाईंदर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मराठी आणि हिंदी भाषिक वर्गामध्ये काही संघर्ष निर्माण झाला होता. या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली मोर्चे काढण्याचे आले होते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात तणाव आणि कटुता निर्माण झाली आहे. ती अजिबात योग्य नाही. ही कटुता आणि तणाव कमी […]

अधिक वाचा..