जेवण केल्यानंतर तुम्हाला स्नॅक्स खाण्याची सवय आहे का? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

पौष्टिक आहार हा निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे; पण त्याचबरोबर चांगल्या आहाराच्या सवयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. अनेक जण जेवण केल्यानंतर स्नॅक्स खातात. खरेच जेवण केल्यानंतर स्नॅक्स खाणे कितपत चांगले आहे. अनेक लोक वेगवेगळ्या कारणांमुळे स्नॅक्स खातात. कधी ऊर्जा वाढविण्यासाठी खातात; तर कधी त्यांना हार्मोनल बदलांमुळे स्नॅक्स खाण्याची इच्छा निर्माण होते. काही जण रक्तातील साखरेची पातळी कमी झाली […]

अधिक वाचा..

जेवणानंतर खूप सुस्ती येते- झोपून राहावं वाटत,या 3 टिप्स वापरा झोप पळून जाईल फ्रेश वाटेल

सकाळी उठल्यापासून प्रत्येकाचीच आपापली कामं सुरू असतात. ज्या महिलांना ऑफिसला जावं लागतं त्यांची तर जरा जास्तच धावपळ असते. अगदी धावत पळत प्रत्येक काम उरकून ऑफिस गाठायचं. तिथे पुन्हा एकदा स्वत:ला कामाला जुंपून घ्यायचं हे रोजचंच. या सगळ्या धावपळीला ब्रेक लागतो तो दुपारच्या जेवणानंतर. निवांत पोटभर जेवण केलं की डोळे आपोआप जड पडू लागतात. अंगात आळस […]

अधिक वाचा..

राज्य कर्जबाजारी झालं असताना चांदीच्या ताटात जेवणावळी का झोडल्या जात आहेत

राज्यात महिला पोलिसच सुरक्षित नसतील आणि तेही भाजप पदाधिकारी विनयभंग करत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था उरली का? नागपूर: राज्य एकीकडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिले जाते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असताना चांदीच्या ताटात जेवणावळी झोडण्याची आवश्यकता होती का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला […]

अधिक वाचा..

जेवणाआधी पाणी प्यायलं की वजन वाढत नाही

पाणी आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण आधार आहे. शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायलात नाही तर तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे शरीरात वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. जेवताना पाणी पिण्यापेक्षा जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा २० मिनिटांनी पाणी प्यायला हवं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कसं पाणी पिता, किती पिता हे […]

अधिक वाचा..

रोज करता ते जेवण आयुर्वेदिक कसं बनवाल, बघा सोपी पद्धत

उठण्या-बसण्यापासून ते खाण्या-पिण्यापर्यंतचे झोपण्याचे सगळे नियम सांगितले आहेत. जे फॉलो करून तुम्ही एक नॅचरल आणि हेल्दी जीवन जगू शकता. हे आयुर्वेदिक उपाय तुम्हाला निरोगी ठेवण्यासोबतच तुमचं आयुष्यही वाढवतात. आयुर्वेदात आयुर्वेदिक जेवण कसं असतं, याबाबतही सांगण्यात आलं आहे. हे आयुर्वेदिक जेवण तुमचा अनेक गंभीर आजारांपासून बचाव करू शकतं. तुम्ही आयुर्वेदिक उपाय, आयुर्वेदिक उपचार किंवा चिकित्सेबाबत, आयुर्वेदिक […]

अधिक वाचा..

जेवणानंतर चालल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का?

चालणे हा आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आहे असे सांगितले जाते, पण जेवणानंतर तुम्ही चालता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेवर नेमका काय परिणाम होतो हे माहिती आहे का? जेवणानंतर किमान ३० मिनिटे चालल्याने साखरेचे प्रमाण तितके वाढत नाही, जितके व्यक्ती बसून असताना वाढते. चालणे हे रक्तातील साखरेच्या प्रमाणात होणारी वाढ कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. रक्तातील साखरेच्या […]

अधिक वाचा..

रोजच्या जेवणात २ चमचे तुपाचा वापर केल्याने शरीराला होतात अनेक फायदे 

जाड व्यक्ती दिसली, की उपहासाने लोक म्हणतात, तूप जरा कमी खात जा. वास्तविक पाहता, जाडेपणाचा आणि तुपाचा दुरान्वये संबंध नाही. अर्थात अतिप्रमाणात सेवन केले, तर कोणतीही गोष्ट वाईटच. परंतु तूप हे शरीराला अपायकारक नसून उपायकारक आहे. थंडीत तर तूप खाणे ‘मस्ट’ आहे. एका श्लोकात वर्णन केलेले आहे. स्मृती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओझ: कफमेदोविवर्धनम  सर्वंस्नेहोत्तमम शीतम […]

अधिक वाचा..

जेवण करताना पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर कसा होतो परिणाम

पचनाशी संबंधित अनेक समज आणि गैरसमज खूप लवकर पसरतात. असाच एक समज आहे की, जेवणाबरोबर किंवा त्यानंतर पाणी प्यायल्याने पोटातील ॲसिड खूप पातळ होते, ज्यामुळे अन्न पचण्यास अवघड जाते आणि आपली पचनक्रिया बिघडते; याशिवाय पोटाच्या इतर समस्यासुद्धा वाढतात. खरंतर पोटातील ॲसिडचे काम हे पाण्याच्या सेवनाकडे दुर्लक्ष करून पचनाचे कार्य सुरळीत पार पाडणे आहे. शरीरात हायड्रेशनची […]

अधिक वाचा..

जेवणात या डाळीचं वरण खा, भराभर वाढेल व्हिटामीन B-12

शरीराला प्रोटीनप्रमाणेच व्हिटामीनही आवश्यक असते. या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे थकवा येणं, कमकुवतपणा, सूज येणं, स्मरणशक्ती कमी होणं, रक्ताची कमतरता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात भारतीयांच्या आहारात डाळींचे खास महत्व आहे. डाळींना प्रोटीनचे भांडार मानले जाते. ठराविक डाळीचे पाणी प्यायल्यानं २१ दिवसांत व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करता येते. शरीरातलं व्हिटामीन […]

अधिक वाचा..

जेवणानंतर फेरफटका मारणे, पचनक्रियेसह मधुमेहींसाठीही उपयोगी आहे…

जेवल्यानंतर थोडा वेळ फिरणे किंवा चालणे ही बहुतांश भारतीयांच्या सवयींपैकी एक आहे. त्यामुळे पचन क्रिया सुधारते असा अनेकांचा विश्वास आहे. पण जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने पचनक्रिया खरच चांगली राहते का? नुकत्याच झालेल्या एका संशोधनात यावर विशेष अभ्यास करण्यात आला आहे. TOI च्या बातमीनुसार, जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा पोटात गेल्यावर अन्नाचे तुकडे होतात. यानंतर शरीर या अन्नातून […]

अधिक वाचा..