सरकारमध्ये ताळमेळ नसल्याने मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून, खड्डे कोण बुजवणार यावरून गोंधळात गोंधळ

मुंबईतील टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी निर्णयाची टोलवाटोलवी मुंबई: मुंबईतील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमधून मुंबईकरांना होणारा त्रास हा महायुती सरकारच्या धोरण लकव्यातून होत असून निवडणुकीपूर्वी मतदानाचा रतीब मिळवण्यासाठी घेतलेल्या टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सरकारच्या नाकीनऊ आले आहे हे दिसत येत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन न करता अविचाराने निवडणुकीपूर्वी लोकांना भुलवण्यासाठी घेतलेले निर्णय आता सरकारला पूर्ण करता येत […]

अधिक वाचा..

मुंबईत पहिल्याच पावसात पाणी साचले, नालेसफाईच्या नावाने कोट्यवधींचा घोटाळा, मुंबईकरांची फसवणूक

मुंबई: मुंबईत अवघ्या पहिल्याच पावसात अनेक सखल भाग जलमय झाले. सायन, दादर, कुर्ला, कलिना, चांदिवली असल्फा,चेंबूर, धारावी, हिंदमाता, अंधेरी, मालाड, कांदिवली आदी परिसरांमध्ये पाणी तुंबल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाण्यातून वाट काढत घरापर्यंत पोहोचावे लागले. महिला, वयोवृद्धांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. प्रश्न असा आहे की, दरवर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी […]

अधिक वाचा..

रस्त्यांच्या कामात फक्त 25% प्रगती; मुंबईकरांना पुन्हा खड्ड्यांचा आणि गटाऱ्यांचा पावसाळा गिफ्ट

मुंबई: मुंबईतील तब्बल 2121 रस्त्यांपैकी फक्त 479 रस्त्यांचेच काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजे उर्वरित 1600 हून अधिक रस्ते अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत. संपूर्ण शहर खोदलेलं, धुळीत न्हालेलं आणि आता पावसाने चिखलात बुडण्याच्या उंबरठ्यावर आहे. महापालिका आयुक्तांनी फेब्रुवारीत बैठक घेऊन 31 मे पर्यंत काम पूर्ण व्हावं, असं स्पष्ट आदेश दिला होता. मात्र या आदेशाची अक्षरशः पायमल्ली […]

अधिक वाचा..

मुंबईकरांच्या खिशावरचा डल्ला आम्ही सहन करणार नाही

मुंबई: मुंबईची शान आणि सर्वसामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेली बेस्ट आज गंडांतराच्या उंबरठ्यावर उभी आहे. पालिकेच्या प्रशासनाने घेतलेल्या तुघलकी निर्णयामुळे बेस्टच्या भाड्यात थेट दुप्पट वाढ करण्यात आली आहे, आणि तीही केवळ काही मोजक्या कंत्राटदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी! मुंबईकरांचे खिसे रिकामे करायचे आणि ठराविक कंत्राटदारांची खाती भरायची, असा स्पष्ट अजेंडा पालिका प्रशासनाने उघडपणे स्वीकारल्याचे हे धक्कादायक उदाहरण आहे. […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी आहे की सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी?

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी प्रशासक पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नसून वर्षा बंगल्यावरुन सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी तयार करण्यात आलाय अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली. या अर्थसंकल्पात सगळी उधळपट्टी ही कंत्राटदारांसाठी सुरु असल्याचा […]

अधिक वाचा..