शिरुर तालुका कृषि सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन…

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटनेच्या अनेक मागण्या असुन त्या पुर्ण होताना दिसत नसल्याने संघटनेने विविध मागण्यांसाठी दि ५ मे पासुन काळ्या फिती लावून लोकशाही मार्गाने शिरुर तालुका कृषी कार्यालयाच्या बाहेरच आंदोलन सुरु केले आहे. संघटनेच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे  १) कृषि सेवक कालावधी रद्द करुन कृषि सेवकांना नियमित कृषि सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात […]

अधिक वाचा..

हिंदू नरसंहाराविरोधात भाजपा बंगाली प्रकोष्ठ चे धरणे आंदोलन

मुंबई: संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, कोर्टाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदूंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, असा घणाघात शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी शनिवारी केला. पश्चिम बंगालमधील हिंदू […]

अधिक वाचा..

कुर्ला तहसील कार्यालयातील दलालीच्या सुळसुळाटाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा घेराव आंदोलन

मुंबई: कुर्ला तहसील कार्यालयातील दलालांची मनमानी, सामान्य नागरिकांची अडवणूक व प्रशासनाची दुर्लक्ष याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज कुर्ला तहसीलदार श्री. दिलीप रायनावार यांना घेराव घालण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले व मुंबई जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयात अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वारस […]

अधिक वाचा..

पाचकंदील चौकातील पार्किंगचा प्रश्न गंभीर, श्रीराम सेना आणि मनसेचे आंदोलन लवकरच…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शहरातील पाच कंदील चौकात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. येथील अनधिकृत बांधकामांमुळे पार्किंगसाठी जागाच शिल्लक राहिली नाही. परिणामी, वाहनधारकांना रस्त्यावरच गाड्या उभ्या कराव्या लागतात आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही गंभीर समस्या सोडवण्या साठी श्रीराम सेना […]

अधिक वाचा..

शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक; १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार

कोल्हापूर: शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली. आझाद मैदानात सकाळी ९ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. राज्यभरातून या मोर्चाला दहा हजारांहून अधिक शेतकरी […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपा युती सरकार विरोधात प्रदेश काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

मंगळवारी ४ मार्च रोजी महापालिका क्षेत्रात काँग्रेसचा युती सरकार विरोधात एल्गार मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज आंदोलन करण्यात आले. भाजपा युती सरकार हे शेतकरीविरोधी असून निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांकडे भाजपा युती दुर्लक्ष करत आहे. झोपी गेलेल्या भाजपा युती सरकारविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करून जोरदार […]

अधिक वाचा..

त्यांनी नौटंकी करण्याऐवजी त्यांच्या खासदारांनी लोकसभेच्या अधिवेशनात परराष्ट्र मंत्र्यांसमोर निषेध नोंदवावा 

नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव… मुंबई: जितेंद्र आव्हाड यांनी परराष्ट्र धोरणावर राज्याच्या विधानभवनात नौटंकी करण्याऐवजी लोकसभेच्या अधिवेशनात त्यांच्या खासदारांनी परराष्ट्र मंत्र्यांसमोर बेड्या घालून करावी असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी लगावला आहे. दरम्यान नकलाकार जितेंद्र आव्हाड यांचा स्टंटबाजी करणे हा स्थायीभाव आहे असा थेट हल्लाबोल आनंद परांजपे यांनी […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३ मार्चला काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

मुख्यमंत्र्यांनी १६ फिक्सर अधिकारी व हे अधिकारी ज्यांच्याकडे काम करत होते त्या मंत्र्यांची नावे जाहीर करावी मुंबई: भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली परंतु अद्याप त्यावर निर्णय घेतला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३ मार्च रोजी […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात मेणबत्ती मोर्चा काढून देशमुख, सूर्यवंशी हत्तेचा निषेध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात मेणबत्ती मोर्चा काढून व हुतात्मा स्मारकाला पुष्प हार घालून, संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांना सकल मराठ समाज व सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सामाजिक संघटना या सर्व संघटनांनी सामुहीक आदरांजली वाहिली. शिरुचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मेणबत्ती हातात धरून निषेध नोंदवण्यात आला. या […]

अधिक वाचा..

मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून आज विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..