राहुल गांधी हुकुमशाहीविरोधात इमानदारीने लढणारा नेता; नाना पटोले

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने बहाल केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहेच पण देशातील जनतेच्याही आशा पल्लवित झालेल्या आहेत. देशात सध्या हुकूमशाही कारभार सुरु असून या तानाशाहीविरोधात इमानदारीने लढाणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले […]

अधिक वाचा..

राहुल गांधींवरील अन्यायी कारवाईविरोधात आज काँग्रेसचे ‘मौन सत्याग्रह’ आंदोलन

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने सुडबुद्धीने कारवाई करत खासदारकी रद्द करुन त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. खोट्या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. मोदी सरकारच्या या दडपशाहीविरोधात तसेच राहुल गांधी यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे हा संदेश देण्यासाठी आज मुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने मौन […]

अधिक वाचा..

राहुल गांधी’ असणं खरंच सोपं नाही; संजय आवटे

मुंबई: वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सख्ख्या काकाचा मृत्यू तुम्ही पाहाता. लाडक्या आजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो, तेव्हा तुम्ही उण्यापु-या चौदा वर्षांचे असता. एकविसाव्या वर्षी वडिलांच्या शरीराच्या झालेल्या चिंधड्या तुम्हाला दिसतात. तरीही, तुम्ही विचलित तर होत नाहीच. उलट, वडिलांच्या मारेक-यांना माफ करता. आई-वडिलांचा प्रेमविवाह. आई मूळची वेगळ्या देशाची. म्हणून, असभ्य, अश्लील भाषेत तिच्यावर रोज टीका […]

अधिक वाचा..

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील अनुभव समृद्ध करणारा; राहुल गांधी

जळगाव: भारत जोडो यात्रेला महाराष्ट्राच्या जनतेने अपार प्रेम दिले, आमच्यावर विश्वास दाखवला. 14 दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या भूमीने मला दिलेला अनुभव समृद्ध करणारा आहे असे उद्गार काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांनी काढले. बुलढाणा जिल्ह्रातील आजच्या शेवटच्या सांगता निमखेड येथे झाली. यावेळी […]

अधिक वाचा..

नोटबंदी व जीएसटीने हिंदुस्थानची अर्थव्यवस्था बर्बाद केली; राहुल गांधी

मुंबई: नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केल्या. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करुन देशातील उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली, असा घणाघाती हल्ला खासदार राहुलजी गांधी यांनी केला. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुस-या […]

अधिक वाचा..