घोड धरणात 82 टक्के पाणीसाठा, उजव्या आणि डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणामध्ये 82 टक्के पाणीसाठा झाला असुन धरणाच्या उजव्या कालव्यातुन 150 क्युसेस आणि डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती शाखा अभियंता वैभव काळे यांनी दिली. चिंचणी(ता.शिरुर) येथील घोड धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता ७६३८ दशलक्ष घनफुट असुन उपयुक्त […]

अधिक वाचा..

माहिती अधिकारावर सरकारचा घाला; बेकायदेशीर तरतुदी तात्काळ रद्द करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: माहितीचा अधिकार (RTI) हा नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी मिळालेला महत्त्वाचा अधिकार असून, राज्य सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील काही तरतुदी या मूळ कायद्याशी विसंगत आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या तरतुदी तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

मुंबईवर कोणाचा हक्क? बहुसांस्कृतिक ओळख जपत एकीचे आवाहन करणारा संदेश चर्चेत

मुंबई: मुंबईच्या ओळखी, इतिहास आणि मराठी माणसाच्या हक्काच्या प्रश्नावर भाष्य करणारा एक विचारप्रवर्तक संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदेशात मुंबईच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक स्वरूपावर प्रकाश टाकत राजकीय वादांपेक्षा एकी आणि माणुसकी जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई ही कोळी, आगरी, भंडारी यांसारख्या स्थानिक समाजांची भूमी असून काळाच्या ओघात ती देशभरातील […]

अधिक वाचा..

अपंगत्वावर मात करत आकाश खेंगटने मतदानाचा हक्क बजावला 

न्हावरा (अक्षय टेमगिरे): पारोडी येथे 28 वर्षीय अपंग युवक आकाश शांताराम खेंगट याने केले मतदान लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पारोडी येथे अपंग युवक आकाश शांताराम खेंगट वय 28 वर्ष यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. शारीरिक […]

अधिक वाचा..

पप्पा, मी बुडतोय! वडिलांच्या डोळ्यादेखत सिस्टिमने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव

गुरुग्राममध्ये उघड्या बेसमेंटमध्ये कार कोसळली; दोन तास मृत्यूशी झुंज, मदत उशिरा गुरुग्राम: शुक्रवारी रात्री दोन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घरी निघालेल्या एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनियरचा गुरुग्राममध्ये अत्यंत दुर्दैवी अंत झाला. दाट धुकं, बोचरी थंडी आणि रस्त्यावर कोणतेही साईन बोर्ड वा रिफ्लेक्टर नसल्यामुळे त्याची कार थेट मृत्यूच्या सापळ्यात कोसळली. 27 वर्षांचा युवराज मेहता गुरुग्राममधील एका खासगी […]

अधिक वाचा..

बर्फाच्या बाटलीचा शेक योग्य की अयोग्य

शरीरावर झालेली दुखापत नैसर्गिकरीत्या बरी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. मुका मार, सूज यांसारख्या समस्यांवर बर्फाचा शेक दिला जातो. त्यात आता सोशल मीडियावर तळपायांच्या वेदना कमी करण्यासाठी बर्फाची बाटली पायाखाली फिरवण्याचा एक नवा ट्रेंड दिसून येत आहे. त्यामुळे तळपायांमधील वेदना कमी होतात, असे म्हटले जाते. पण, खरेच हा उपाय वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो का […]

अधिक वाचा..

बाळाची पहिली आंघोळ, कशी घ्याल काळजी? बाळासाठी योग्य काय

नुकतंच जन्मलेल्या बाळाला आपण जेव्हा हातात घेतो तेव्हा त्याच्या नाजुकशा त्वचेचा मऊ- मुलायम स्पर्श आपल्याला हळवं करून टाकतो. अगदी कापसासारखी मऊ असणारी बाळाची त्वचा सुरुवातीच्या काही दिवसांत खूपच कोमल आणि नाजूक असते. ती त्वचा एवढी संवेदनशील असते की एखाद्या जाडसर कपड्यामुळेच काय पण कापसामुळेही ती दुखावली जाऊ शकते. लाल होते. बऱ्याचदा बाळाची त्वचा कोरडी पडून […]

अधिक वाचा..

तुमच्या केसांसाठी कोणते सिरम योग्य आहे 

आताशा बहुधा केस गळण्याची समस्या तिशी, चाळिशीनंतर सर्वाधिक प्रमाणात उद्भवताना दिसते. खाण्यापिण्यातील बदल आणि अनियमितता यांमुळे कमी वयातच केस गळण्याची समस्या लोकांना त्रस्त करीत आहे. केसगळती थांबवून, केसांच्या वाढीसाठी नवीन तेले, शॅम्पू बाजारात उपलब्ध आहेत. काही जण केस गळू नये म्हणून कंगवासुद्धा बदलतात. महिलांमध्ये लाकडाच्या कंगव्यांची क्रेझ आहे. केस जास्त गळू नयेत यासाठी अनेक जणी […]

अधिक वाचा..

जगदीप धनखड बेधडकपणे बोलले अन् तिथंच घात झाला

मुंबई: संसदेच्या अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जय्यत तयारी केली होती. विरोधकांकडे अनेक मुद्देही होते. पण त्याआधी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा तडकाफडकी राजीनामा देत सरकारची कोंडी केली. विरोधकांना आयते कोलित मिळाले. आता धनखड यांनी अचानक राजीनामा का दिले, यावरून अनेक तर्क मांडले जात आहेत. त्यांनी आरोग्याचे कारण दिले असले तरी कुणालाच […]

अधिक वाचा..

योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान केला पाहिजे; जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर 

भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डेच्यावतीने संयुक्त जयंती उत्सव साजरा सिंधुदुर्ग: योग्य व्यक्तींचा योग्य सन्मान आणि गौरव केला पाहिजे. शिवाय, केलेले उपकार न विसरता त्यांच्याविषयी कृतज्ञ असले पाहिजे. त्याच जाणिवेने भारतीय बौद्ध महासभा शाखा कासार्डे कदमवाडीचे काम विजय कदम आणि सहकाऱ्यांच्या सहकाऱ्याने सुरू आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले. ते कासार्डे […]

अधिक वाचा..