रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान (वर्किंग नॉलेज) अनिवार्य करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी […]

अधिक वाचा..

ग्रामपंचायतींवर जुन्या सरपंचांच्या नियुक्तीला ब्रेक; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला स्थगिती

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारासंदर्भात महत्त्वाचा अंतरिम दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वादग्रस्त निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुन्हा जुन्याच सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयावर खंडपीठाने गंभीर आक्षेप नोंदवला. पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही नवीन प्रशासक नियुक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणावर […]

अधिक वाचा..

आरोग्य योजनांचा लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: ‘आयुष्यमान भारत’ आणि ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने’चा लाभ गरजू रुग्णांना नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयांचा मनमानी कारभार सुरू आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णांना आरोग्य योजनांचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या काळात सभागृहात मांडला. ते म्हणाले, चंद्रपूर […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ‘क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन-राबविण्यास राज्य शासनाचा पुढाकार

राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीवर अधिक भर देण्यात यावा; चंद्रकांतदादा पाटील मंत्री यांचे आवाहन मुंबई: केंद्र शासनाने “राष्ट्रीय क्वांटम मिशन (National Quantum Mission – NQM)” सुरू केले असून, क्वांटम संगणन, क्वांटम संवाद, क्वांटम सेन्सिंग व क्वांटम मटेरियल्स या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक पातळीवर अग्रणी बनविणे या मिशनचा मुख्य उद्देश आहे. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही! मंत्र्याचा मुलगा फरार, तरी अटक नाही; हायकोर्टाचा राज्य सरकारला जाब

मुंबई: महाड नगर परिषदेच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या तुफान हाणामारी प्रकरणात कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि पुतण्या महेश गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल होऊन महिना उलटूनही अटक न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची तीव्र शब्दांत खरडपट्टी काढली आहे. “मंत्र्यांचा मुलगा फरार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच कसे करत नाहीत? महाराष्ट्रात कायद्याचे राज्य […]

अधिक वाचा..

घरपट्टी–पाणीपट्टीवर मिळणार ५०% सवलत! राज्य शासनाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: राज्य शासनाने ग्रामपंचायतींमधील थकीत करवसुली वाढवण्यासाठी आणि गावांच्या विकासाला नवा वेग देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. निवासी मालमत्ता धारकांना आता घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करांवर थेट ५०% सवलत मिळणार आहे. या निर्णयामागील कारणे काय ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर करथकबाकी अडकून राहिल्यामुळे गावातील खालील सुविधा अडथळ्यात आल्या होत्या पाणीपुरवठा रस्त्यांवरील दिवाबत्ती रस्ते दुरुस्ती स्वच्छता मोहिमा शाळा […]

अधिक वाचा..

आता 100 टक्के टोलमाफी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय…

मुंबई: केंद्र सरकार तसेच राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्याला प्रोत्साहन देत आहे. याच निर्णयांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने राज्यातील 3महामार्गांवर सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी दिली आहे. कोणत्या वाहनांना टोलमाफी मिळणार राज्य सरकारचा हा निर्णय आता […]

अधिक वाचा..

पुणे मेट्रो टप्पा – २ मध्ये ही दोन नवीन स्थानके; राज्य शासनाची अतिरिक्त खर्चास मान्यता

मुंबई: पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बालाजीनगर व बिबेवाडी येथे ही दोन मेट्रो स्थानके उभारली जाणार असून त्यासाठी येणाऱ्या ६८३.११ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ च्या […]

अधिक वाचा..

ओबीसीमध्ये आणखी ‘या’ २९ जातींचा होणार समावेश राज्य सरकार पाठविणार केंद्राकडे प्रस्ताव

संभाजीनगर: राज्यातील इतर मागासवर्ग (OBC) यादी आणखी विस्तारित होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने नुकताच मोठा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावात २९ जाती व उपजाती नव्याने समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पुढची प्रक्रिया कशी राज्य सरकारची मंजुरी त्यानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल केंद्राची अंतिम मोहोर उमटल्यानंतर नव्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळणार […]

अधिक वाचा..

विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विद्यार्थी सुरक्षित वाहतूकीसह बेरोजगारांना रोजगाराची ही संधी मुंबई: शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनाधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्यात येत आहेत. या बाबतची अधिसूचना जारी होईल, […]

अधिक वाचा..