राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी “बांधा वापरा हस्तांतरित करा” या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी व अंबोली, या बसस्थानकांचा विकास तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना परिवहनमंत्री प्रताप […]

अधिक वाचा..

मंत्री नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम

नवी दिल्ली: फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. दुसऱ्याचे घर पेटवायला निघालेल्या लोकांनी हे लक्षात घ्यावे की तुमचे घर पेटले आहे. औरंगजेबाची कबर यांना का आठवत आहे? कारण सरकारचे अपयश लपण्यासाठी हे सगळे सुरू आहे. लाडकी बहीण, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या […]

अधिक वाचा..

राज्यात आठवड्याभरात वाळू धोरण आणणार, आ. प्रविण दरेकरांच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांची घोषणा

मुंबई: सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा करण्यास सुप्रीम कोर्टाने बंदी घातली असताना राज्यात, विशेषता कोकणात वाळू माफियांकडून सर्रासपणे बंदी मोडून वाळू उपसा सुरू असल्याची गंभीर मुद्दा भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत सरकारच्या निदर्शनास आणून दिला. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गोष्टींना आळा घालण्यासाठी राज्यात आठवड्याभरात वाळू धोरण आणणार असल्याची घोषणा केली. विधानपरिषदेत […]

अधिक वाचा..

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार

रत्नागिरी: राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन देऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. गँग्ज ऑफ वासेपूर […]

अधिक वाचा..

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी 

ठाणे: माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी, अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे आयोजित भव्य दिव्य “केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025” च्या *अंतिम सामन्याच्या* प्रसंगी ते बोलत होते. […]

अधिक वाचा..

राज्यात धार्मिक व्देष पसरवून महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा कुटील डाव

मुंबई: महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दतेला सुरुंग लावण्याचा […]

अधिक वाचा..

पंतप्रधान यांचा विकसित भारताचा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी राज्याचा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरेल

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ मध्ये विकसित भारताचा संकल्प सोडला आहे. हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प मैलाचा दगड ठरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज मांडलेला ऐतिहासिक असा अकरावा अर्थसंकल्प म्हणजे, शाश्वत विकासाचा शिस्तबद्ध संकल्प आहे. अशा शब्दात सुनिल […]

अधिक वाचा..

पेट्रोल पंप सुरु करायचा आहे मग तयारीला लागा; राज्यात मंजूर झाले 1600 पेट्रोल पंप

मुंबई: राज्यातील इंधन वितरणाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीस गती देण्यासाठी 1,600 नव्या पेट्रोल पंपांना मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच, आगामी काळात 2,000 नवीन पेट्रोल पंप उभारण्याचे नियोजन सुरू आहे. महसूल विभागाने “एक खिडकी योजना” सूरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे पेट्रोल पंप मंजुरी प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांचे निराकरण होईल. परवानग्या जलदगतीने मिळणार असल्याने, इच्छुक उद्योजकांसाठी […]

अधिक वाचा..

राज्यावर 8 हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना पुरवणी मागण्यातून सरकारच्या तिजीरोवर डल्ला

मुंबई: राज्यावर 8 हजार कोटी रुपयांचे कर्ज असताना सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांतून सरकारच्या तिजीरोवर डल्ला मारण्याच काम करण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यावरील त्यांच्या भाषणात केला. सरकार मोठं मोठया घोषणा करत मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करत नाही. राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी स्थिर करायची असल्यास लोकप्रिय […]

अधिक वाचा..

महानगरपालिका क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन…

राज्यातील महानगरपालिकांमधील ‘प्रशासनराज’ मुळे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून झालेल्या नसल्याने सर्व कारभार प्रशासनच चालवत आहे. महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्याने जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत. भाजपा युती सरकार प्रशासनाच्या माध्यमातून फक्त टक्केवारी वसुलीचे काम करत असून जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. महानगरातील जनतेच्या समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून […]

अधिक वाचा..